शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

कुंचल्यातून ज्वलंत समस्यांकडे वेधले लक्ष;  राज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 01:54 IST

दोनशे स्पर्धकांचा सहभाग, तीन लाखांच्या बक्षिसांची लयलूट

देवळी : महात्मा गांधी यांच्या जयंती महोत्सवानिमित्त देवळी नगरपालिकेच्यावतीने राज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यभरातून दोनशे स्पर्धेकांनी सहभाग नोंदवित शहरातील भिंतीवर विविध सामाजिक समस्यांवर आधारीत चित्र रेखाटून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहराकरिता नाविन्यपूर्ण ठरलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील भकास भिंती आता बोलक्या झाल्या आहेत.

नगरपालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी यांच्या जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहभागी चित्रकारांनी पर्यावरण, जलसंधारण, स्वच्छ महाराष्टÑ, स्त्रीभृण हत्या व इतर ज्वलंत समस्यावरील चित्रे रेखाटून जनजागृतीही घडवून आणली. या स्पर्धेत महिला स्पर्धकांचाही मोठा सहभाग होता.या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नगर भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामदास तडस यांच्यासह नगरपालिका उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, पालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, सभापती मिलिंद ठाकरे, नंदू वैद्य, मारोती मरघाडे, नगरसेवक कल्पना ढोक व विजय गोमासे यांची उपस्थिती होती. यात गुणानुक्रमे यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांवर तब्बल तीन लाख रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.पंकज चोरे यांनी मानले.स्पर्धेत प्रतीक प्रथम, तर सुहास तअलदिलवार दुसराराज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धेत नगापूरचा प्रतिक कनोजे याने प्रथम क्रमांक पटकविला. तर चंद्रपुरचा सुहास तअलदिलवार हा द्वितीय, हिंगण्याचा अतुल सहाकर तृतीय, चंद्रपूरचा सदानंद पचारे चतुर्थ, परभणीचा संतोष तलडे पाचवा, सेलूचा राकेश धवने सहावा तर आर्णीचा नौशाद शेख जावेद हा सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. श्रीपत भोगांडे , प्रकाश बनगर, आशिष पोहाणे व गजेंद्र चौधरी यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषीक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेचे परिक्षण कला महाविद्यालय, नागपुरचे अधिव्याख्याता प्रफुल्ल नायसे, शासकीय कला महाविद्यालय, नागपुरचे प्रफुल्ल तायवाडे व परभणीचे केशव लागड यांनी केले. चित्रांचे रेखाटन, रंगकाम, घोषवाक्य विषयाची मांडणी, योग्य उद्देश आदी निकषांवर परिक्षकांनी चित्रांचे गुणांकन केले.