शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

कुंचल्यातून ज्वलंत समस्यांकडे वेधले लक्ष;  राज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 01:54 IST

दोनशे स्पर्धकांचा सहभाग, तीन लाखांच्या बक्षिसांची लयलूट

देवळी : महात्मा गांधी यांच्या जयंती महोत्सवानिमित्त देवळी नगरपालिकेच्यावतीने राज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यभरातून दोनशे स्पर्धेकांनी सहभाग नोंदवित शहरातील भिंतीवर विविध सामाजिक समस्यांवर आधारीत चित्र रेखाटून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहराकरिता नाविन्यपूर्ण ठरलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील भकास भिंती आता बोलक्या झाल्या आहेत.

नगरपालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी यांच्या जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहभागी चित्रकारांनी पर्यावरण, जलसंधारण, स्वच्छ महाराष्टÑ, स्त्रीभृण हत्या व इतर ज्वलंत समस्यावरील चित्रे रेखाटून जनजागृतीही घडवून आणली. या स्पर्धेत महिला स्पर्धकांचाही मोठा सहभाग होता.या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नगर भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खासदार रामदास तडस यांच्यासह नगरपालिका उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, पालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, सभापती मिलिंद ठाकरे, नंदू वैद्य, मारोती मरघाडे, नगरसेवक कल्पना ढोक व विजय गोमासे यांची उपस्थिती होती. यात गुणानुक्रमे यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांवर तब्बल तीन लाख रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.पंकज चोरे यांनी मानले.स्पर्धेत प्रतीक प्रथम, तर सुहास तअलदिलवार दुसराराज्यस्तरीय भित्तीचित्र स्पर्धेत नगापूरचा प्रतिक कनोजे याने प्रथम क्रमांक पटकविला. तर चंद्रपुरचा सुहास तअलदिलवार हा द्वितीय, हिंगण्याचा अतुल सहाकर तृतीय, चंद्रपूरचा सदानंद पचारे चतुर्थ, परभणीचा संतोष तलडे पाचवा, सेलूचा राकेश धवने सहावा तर आर्णीचा नौशाद शेख जावेद हा सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. श्रीपत भोगांडे , प्रकाश बनगर, आशिष पोहाणे व गजेंद्र चौधरी यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषीक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेचे परिक्षण कला महाविद्यालय, नागपुरचे अधिव्याख्याता प्रफुल्ल नायसे, शासकीय कला महाविद्यालय, नागपुरचे प्रफुल्ल तायवाडे व परभणीचे केशव लागड यांनी केले. चित्रांचे रेखाटन, रंगकाम, घोषवाक्य विषयाची मांडणी, योग्य उद्देश आदी निकषांवर परिक्षकांनी चित्रांचे गुणांकन केले.