शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

दौैंड येथील अटलजींचा सभेच्या गर्दीचा उच्चांक अद्यापही अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 18:32 IST

२ सप्टेंबर १९८३ रोजी झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला उपस्थित असलेल्या गर्दीचा उच्चांक आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेते मंडळींनी गाठलेला नाही.

ठळक मुद्देअटलजींनी केली होती शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीकाएकंदरीतच गर्दी पाहता यावेळी २0 स्पिकर

दौैंड : दौैंड शहरातील महात्मा गांधी चौैकात झालेल्या २ सप्टेंबर १९८३ रोजी झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला उपस्थित असलेल्या गर्दीचा उच्चांक आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेते मंडळींनी गाठलेला नाही. गांधी चौैकात अटलजींचे विचार ऐकण्यासाठी दौैंड, इंदापूर, बारामती, श्रीगोंदा, येथून मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. एकंदरीतच गर्दी पाहता यावेळी २0 स्पिकर लावण्यात आले होते. या सभेच्या संदर्भात तत्कालीन भाजपाचे शहराध्यक्ष प्रकाशजी बोगावत, भाजपाचे जिल्हा सचिव मोहनलालजी भंडारी यांनी माहिती देताना सांगितले की, दौैंड तालुक्याचे आमदार राजारामबापू ताकवणे आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जावडेकर यांच्या पुढाकाराने ही सभा झाली होती की जेणेकरुन भारतीय जनता पार्टीच्या सदस्य संख्येत वाढ व्हावी म्हणून. यावेळेला दौैंड तालुका भाजपाच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांना पाच लाख रुपयांचा निधी पक्ष विकासाठी देण्यात आला होता. व्यासपीठावर येण्यापूर्वी अटलजी जुन्या रेल्वे कुरकुंभ मोरीजवळ आले. त्यावेळेस त्यांची नजर कुरकुंभ मोरीजवळ असलेल्या उंच पादचारी पूलावर गेली. त्यांच्या या दृष्टीचा संदर्भ घेत ते ४५ मिनिटांच्या जाहीर भाषणात म्हणाले होती की, रेल्वे मोठ्या प्रमाणावर खर्च करते मात्र कुठल्याही गोष्टीचे नियोजन नसते. मोठ्या प्रमाणावर लोखंडी पायऱ्या असलेल्या या पूलावरुन तरुणांची देखील दमछाक होईल तर वयोवृद्ध माणसांचे काय? असे सांगून शेतकरी, सर्वसामान्य माणूस यासह भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणे स्पष्ट केली होती.

....................

* शरद पवारांवर अप्रत्यक्ष टिका

दौंड येथील सभेत अटलजींनी शहराच्या विकासाबाबत नाराजी व्यक्त केली होती. आणि त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता बारामती लोकसभा मतदार संघात दौंड तालुका येतो. तेव्हा या तालुक्याचा विकास का होत नाही अशी टीका देखील त्यांनी केली असल्याचे भाजपाच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी सांगितले.

.....................

* आणि खलिस्तान चळवळ स्पष्ट केली १९८३ साली खलिस्तान चळवळ सुरु होती. या खलिस्तान चळवळीची आठवण देताना अटलजी म्हणाले की, ‘मारणेवालो को मालूम नही क्यो मार रहे है। और मरनेवालोको भी मालूम नही था की, क्यो मर रहे है।’ अशी गोंधळमय परिस्थिती त्यांनी दौंडच्या सभेत स्पष्ट केली असल्याचे तत्कालीन पुणे जिल्हा भाजपाचे सरचिटणीस मोहनलालजी भंडारी यांनी सांगितले.

..........................

* लोक भुके नही रहते दौंड येथील सभेत अटलजी यांनी काही विनोदी चुटके देखील सांगितले होते. ते म्हणाले होते की, ‘अचानक घरमें खाना खाने के लिय लोकं बढ गये, तो दाल ऐसी चिज हे, जिसमे कितना भी पाणी मिलावो लोक भुके नही रहते’ अशी आठवण तत्कालीन दौंड शहर भाजपाचे अध्यक्ष प्रकाशजी बोगावत यांनी सांगितली.

..........................

* जब्बार पटेल यांनी मुर्हताला वेळ मागितला

दौंड येथील सभा झाल्यानंतर स्टेजवरुन खाली उतरायला अटलजी यांना तब्बल १ तास लागला होता. एवढा मोठा गराडा त्यांच्या भोवती होता. दरम्यान सभेनंतर पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळेला सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. त्यांना त्यांच्या ‘उबंरठा’ या चित्रपटाचा मुहूर्त अटलजींच्या हस्ते करावयाचा होता. याकामी पटेल यांनी सातत्याने पाठपुरावा केला. पुढे या चित्रपटाच्या मुहूर्ताचे काय झाले हे मात्र समजू शकले नाही.

 

टॅग्स :PuneपुणेAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीSharad Pawarशरद पवार