शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

Atal Bihari Vajpayee : भाजपा-शिवसेना युतीचे अटलजी होते शिल्पकार  

By यदू जोशी | Updated: August 17, 2018 05:34 IST

मागील विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता गेली २५ वर्षे अबाधित असलेल्या भाजपा-शिवसेना युतीचे खरे शिल्पकार अटलबिहारी वाजपेयी हेच होते.

मुंबई : मागील विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता गेली २५ वर्षे अबाधित असलेल्या भाजपा-शिवसेना युतीचे खरे शिल्पकार अटलबिहारी वाजपेयी हेच होते. प्रमोद महाजन यांच्या युतीच्या कल्पनेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी या दोन अलौकिक राजकीय नेत्यांचा कायमचा स्नेहबंध जुळून आला.१९८९मध्ये झालेल्या शिवसेना-भाजपा युतीचे शिल्पकार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपाचे नेते दिवंगत नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेतले जात असले तरी वाजपेयी यांच्याविषयी बाळासाहेबांना असलेल्या आपुलकीच्या भावनेतूनच युती साकारली गेली. २००३मध्ये भाजपामध्ये अटलबिहारी की अडवाणी, असा नेतृत्वाचा वाद उभा करण्याचा प्रयत्न झाला; तेव्हा एनडीएचे निर्विवाद नेते व पंतप्रधान म्हणून वाजपेयी हेच राहतील, असे बाळासाहेबांनी सांगितले होते. शिवसेनेच्या मुखपत्रातून आज केंद्र व राज्यातील भाजपा नेते व सरकारवर सडकून टीका होते. वाजपेयी सरकार असतानादेखील शिवसेनाप्रमुखांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले; पण वाजपेयींवर वैयक्तिक टीका केली नाही. अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर वाजपेयी हे बाळासाहेबांशी चर्चा करीत असत. सूत्र सांगतात की, वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा बाळासाहेब त्यांना म्हणाले, अटलजी आपण काळजी करू नका. मंत्रिमंडळ स्थापन करताना आपण शिवसेनेचा कोटा किती असावा याचे काही दडपण वगैरे ठेवू नका. आपले नेतृत्व ही देशाची गरज आहे. आपण पंतप्रधान होणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अर्थात, वाजपेयींनी त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला सन्मानाने सामावून घेतले. एवढेच नव्हेतर, मनोहर जोशी यांना पुढे लोकसभेचे अध्यक्षपद दिले. भाजपा-शिवसेना युती सरकारमध्ये संघर्षाचे काही प्रसंग १९९५ ते ९९ दरम्यान आले तेव्हा बाळासाहेबांप्रमाणेच अटलबिहारींचा शब्द अंतिम असायचा. दोघांना एकमेकांप्रति कमालीचा आदर होता. युती टिकलीच पाहिजे या मुद्द्याला सर्वोच्च प्राधान्य होते आणि त्यासाठी तडजोड करण्याची तयारी असायची.मुंबईच्या साक्षीने अध्यक्षभारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली अन् या नव्या पक्षाच्या मुंबईतील पहिल्याच अधिवेशनात वाजपेयी अध्यक्ष झाले. त्यांच्या अमोघ वाणीने आणि प्रभावशाली नेतृत्वाने भारावून गेलेले हजारो कार्यकर्ते राज्यात तेव्हाही होते. हजारो किलोमीटरचा प्रवास कधी बसने, कधी कार्यकर्त्याच्या दुचाकीवर तर कधी रेल्वेने करीत चांद्यापासून बांद्यापर्यंत वाजपेयी यांनी असंख्य कार्यकर्ते जोडले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे