शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Atal Bihari Vajpayee : भाजपा-शिवसेना युतीचे अटलजी होते शिल्पकार  

By यदू जोशी | Updated: August 17, 2018 05:34 IST

मागील विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता गेली २५ वर्षे अबाधित असलेल्या भाजपा-शिवसेना युतीचे खरे शिल्पकार अटलबिहारी वाजपेयी हेच होते.

मुंबई : मागील विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता गेली २५ वर्षे अबाधित असलेल्या भाजपा-शिवसेना युतीचे खरे शिल्पकार अटलबिहारी वाजपेयी हेच होते. प्रमोद महाजन यांच्या युतीच्या कल्पनेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी या दोन अलौकिक राजकीय नेत्यांचा कायमचा स्नेहबंध जुळून आला.१९८९मध्ये झालेल्या शिवसेना-भाजपा युतीचे शिल्पकार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपाचे नेते दिवंगत नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेतले जात असले तरी वाजपेयी यांच्याविषयी बाळासाहेबांना असलेल्या आपुलकीच्या भावनेतूनच युती साकारली गेली. २००३मध्ये भाजपामध्ये अटलबिहारी की अडवाणी, असा नेतृत्वाचा वाद उभा करण्याचा प्रयत्न झाला; तेव्हा एनडीएचे निर्विवाद नेते व पंतप्रधान म्हणून वाजपेयी हेच राहतील, असे बाळासाहेबांनी सांगितले होते. शिवसेनेच्या मुखपत्रातून आज केंद्र व राज्यातील भाजपा नेते व सरकारवर सडकून टीका होते. वाजपेयी सरकार असतानादेखील शिवसेनाप्रमुखांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले; पण वाजपेयींवर वैयक्तिक टीका केली नाही. अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर वाजपेयी हे बाळासाहेबांशी चर्चा करीत असत. सूत्र सांगतात की, वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा बाळासाहेब त्यांना म्हणाले, अटलजी आपण काळजी करू नका. मंत्रिमंडळ स्थापन करताना आपण शिवसेनेचा कोटा किती असावा याचे काही दडपण वगैरे ठेवू नका. आपले नेतृत्व ही देशाची गरज आहे. आपण पंतप्रधान होणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अर्थात, वाजपेयींनी त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला सन्मानाने सामावून घेतले. एवढेच नव्हेतर, मनोहर जोशी यांना पुढे लोकसभेचे अध्यक्षपद दिले. भाजपा-शिवसेना युती सरकारमध्ये संघर्षाचे काही प्रसंग १९९५ ते ९९ दरम्यान आले तेव्हा बाळासाहेबांप्रमाणेच अटलबिहारींचा शब्द अंतिम असायचा. दोघांना एकमेकांप्रति कमालीचा आदर होता. युती टिकलीच पाहिजे या मुद्द्याला सर्वोच्च प्राधान्य होते आणि त्यासाठी तडजोड करण्याची तयारी असायची.मुंबईच्या साक्षीने अध्यक्षभारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली अन् या नव्या पक्षाच्या मुंबईतील पहिल्याच अधिवेशनात वाजपेयी अध्यक्ष झाले. त्यांच्या अमोघ वाणीने आणि प्रभावशाली नेतृत्वाने भारावून गेलेले हजारो कार्यकर्ते राज्यात तेव्हाही होते. हजारो किलोमीटरचा प्रवास कधी बसने, कधी कार्यकर्त्याच्या दुचाकीवर तर कधी रेल्वेने करीत चांद्यापासून बांद्यापर्यंत वाजपेयी यांनी असंख्य कार्यकर्ते जोडले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे