शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee : भाजपा-शिवसेना युतीचे अटलजी होते शिल्पकार  

By यदू जोशी | Updated: August 17, 2018 05:34 IST

मागील विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता गेली २५ वर्षे अबाधित असलेल्या भाजपा-शिवसेना युतीचे खरे शिल्पकार अटलबिहारी वाजपेयी हेच होते.

मुंबई : मागील विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता गेली २५ वर्षे अबाधित असलेल्या भाजपा-शिवसेना युतीचे खरे शिल्पकार अटलबिहारी वाजपेयी हेच होते. प्रमोद महाजन यांच्या युतीच्या कल्पनेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी या दोन अलौकिक राजकीय नेत्यांचा कायमचा स्नेहबंध जुळून आला.१९८९मध्ये झालेल्या शिवसेना-भाजपा युतीचे शिल्पकार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपाचे नेते दिवंगत नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेतले जात असले तरी वाजपेयी यांच्याविषयी बाळासाहेबांना असलेल्या आपुलकीच्या भावनेतूनच युती साकारली गेली. २००३मध्ये भाजपामध्ये अटलबिहारी की अडवाणी, असा नेतृत्वाचा वाद उभा करण्याचा प्रयत्न झाला; तेव्हा एनडीएचे निर्विवाद नेते व पंतप्रधान म्हणून वाजपेयी हेच राहतील, असे बाळासाहेबांनी सांगितले होते. शिवसेनेच्या मुखपत्रातून आज केंद्र व राज्यातील भाजपा नेते व सरकारवर सडकून टीका होते. वाजपेयी सरकार असतानादेखील शिवसेनाप्रमुखांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले; पण वाजपेयींवर वैयक्तिक टीका केली नाही. अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर वाजपेयी हे बाळासाहेबांशी चर्चा करीत असत. सूत्र सांगतात की, वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा बाळासाहेब त्यांना म्हणाले, अटलजी आपण काळजी करू नका. मंत्रिमंडळ स्थापन करताना आपण शिवसेनेचा कोटा किती असावा याचे काही दडपण वगैरे ठेवू नका. आपले नेतृत्व ही देशाची गरज आहे. आपण पंतप्रधान होणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अर्थात, वाजपेयींनी त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला सन्मानाने सामावून घेतले. एवढेच नव्हेतर, मनोहर जोशी यांना पुढे लोकसभेचे अध्यक्षपद दिले. भाजपा-शिवसेना युती सरकारमध्ये संघर्षाचे काही प्रसंग १९९५ ते ९९ दरम्यान आले तेव्हा बाळासाहेबांप्रमाणेच अटलबिहारींचा शब्द अंतिम असायचा. दोघांना एकमेकांप्रति कमालीचा आदर होता. युती टिकलीच पाहिजे या मुद्द्याला सर्वोच्च प्राधान्य होते आणि त्यासाठी तडजोड करण्याची तयारी असायची.मुंबईच्या साक्षीने अध्यक्षभारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली अन् या नव्या पक्षाच्या मुंबईतील पहिल्याच अधिवेशनात वाजपेयी अध्यक्ष झाले. त्यांच्या अमोघ वाणीने आणि प्रभावशाली नेतृत्वाने भारावून गेलेले हजारो कार्यकर्ते राज्यात तेव्हाही होते. हजारो किलोमीटरचा प्रवास कधी बसने, कधी कार्यकर्त्याच्या दुचाकीवर तर कधी रेल्वेने करीत चांद्यापासून बांद्यापर्यंत वाजपेयी यांनी असंख्य कार्यकर्ते जोडले.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे