शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

"एक तर तुम्ही तरी राहाल, नाही तर मी तरी...", उद्धव ठाकरेंच्या 'त्या' इशाऱ्यावर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 21:12 IST

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारासोबतसंवाद साधाला आणि पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी, 'एक तर तुम्ही राहाल, नाही तर मी', या उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरही भाष्य केले. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयानंतर, आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. यानंतर आता राज्यात 'देवेंद्र 3.0'ला सुरुवात झाली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य समारंभ पार पडला. यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारासोबतसंवाद साधाला आणि पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी, 'एक तर तुम्ही तरी राहाल, नाही तर मी तरी', या उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरही भाष्य केले. 

यावेळी, २०२४ नंतरच्या महाराष्ट्राकडे कसे पाहता? असे विचारले असता फडणवीस म्हणाले, "मला असे वाटते की, महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करत आहे, मात्र महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीवर पुनर्विचार करण्याची गरज सर्व पक्षांना आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण योग्य कसे करता येईल, याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब, माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय सुशीलकुमार शिंदेजी, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब किंवा सन्माननीय राज ठाकरे साहेब असती, अशा सर्व प्रमुख लोकांना स्वतः फोन करून निमंत्रण दिले. त्यांतील प्रत्येकाने माझे अभिनंदन केले, मला शुभेच्छा दिल्या. काही व्यक्तिगत कारणांनी ती लोकं येऊ शकली नाहीत. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या."

फडणवीस पुढे म्हणाले, "मला वाटते की महाराष्ट्रामध्ये, इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेकडील राज्यांमध्ये जे अंतर आहे, ते हेच आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद कधी संपला नाही. आपण अनेक राज्यांमध्ये पाहतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये एवढा विसंवाद असतो की, हिंदीमध्ये ज्याला "खून के प्यासे" म्हणतात, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती महाराष्ट्रात नव्हती, आजही नाही आणि ती पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल."

यावेळी, "एक तर तुम्ही राहाल नाही तर मी", असे म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्याल? असे विचारले असता फडणवीस म्हणाले, "नाही नाही, मी त्याच वेळेस सांगितलं होतं की, राजकारणात सगळेच राहतात, तेही (उद्धव ठाकरे) राहतील आणि मीही राहील. आम्ही सगळेच राहणार आहोत."

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? -विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला  होता. ते म्हणाले होते, "कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक आज माझ्या घरावर चालून येत आहेत. अनिल देशमुखांनी सांगितले की, कसे मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. हे सगळे सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन."    

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा