शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"एक तर तुम्ही तरी राहाल, नाही तर मी तरी...", उद्धव ठाकरेंच्या 'त्या' इशाऱ्यावर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 21:12 IST

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारासोबतसंवाद साधाला आणि पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी, 'एक तर तुम्ही राहाल, नाही तर मी', या उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरही भाष्य केले. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयानंतर, आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. यानंतर आता राज्यात 'देवेंद्र 3.0'ला सुरुवात झाली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य समारंभ पार पडला. यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारासोबतसंवाद साधाला आणि पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांनी, 'एक तर तुम्ही तरी राहाल, नाही तर मी तरी', या उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरही भाष्य केले. 

यावेळी, २०२४ नंतरच्या महाराष्ट्राकडे कसे पाहता? असे विचारले असता फडणवीस म्हणाले, "मला असे वाटते की, महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करत आहे, मात्र महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीवर पुनर्विचार करण्याची गरज सर्व पक्षांना आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण योग्य कसे करता येईल, याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब, माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय सुशीलकुमार शिंदेजी, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब किंवा सन्माननीय राज ठाकरे साहेब असती, अशा सर्व प्रमुख लोकांना स्वतः फोन करून निमंत्रण दिले. त्यांतील प्रत्येकाने माझे अभिनंदन केले, मला शुभेच्छा दिल्या. काही व्यक्तिगत कारणांनी ती लोकं येऊ शकली नाहीत. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या."

फडणवीस पुढे म्हणाले, "मला वाटते की महाराष्ट्रामध्ये, इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेकडील राज्यांमध्ये जे अंतर आहे, ते हेच आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद कधी संपला नाही. आपण अनेक राज्यांमध्ये पाहतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये एवढा विसंवाद असतो की, हिंदीमध्ये ज्याला "खून के प्यासे" म्हणतात, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती महाराष्ट्रात नव्हती, आजही नाही आणि ती पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल."

यावेळी, "एक तर तुम्ही राहाल नाही तर मी", असे म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्याल? असे विचारले असता फडणवीस म्हणाले, "नाही नाही, मी त्याच वेळेस सांगितलं होतं की, राजकारणात सगळेच राहतात, तेही (उद्धव ठाकरे) राहतील आणि मीही राहील. आम्ही सगळेच राहणार आहोत."

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? -विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला  होता. ते म्हणाले होते, "कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक आज माझ्या घरावर चालून येत आहेत. अनिल देशमुखांनी सांगितले की, कसे मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. हे सगळे सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन."    

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा