शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

विधानसभेला होणार लोकसभेची पुनरावृत्ती; वंचित-काँग्रेस युती फिसकटण्याची चिन्हे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 18:23 IST

लोकसभा निवडणुकीत जागावाटपच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत महाआघाडीत सामील झाले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे २ महिने शिल्लक राहिले असताना, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपाच्या मुद्यावर अजूनही तोडगा निघू शकला नाही. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा अटोकाट प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला दिलेली ४० जागांची ऑफर आणि वंचितच्या अटींमुळे ही युती फिसकटण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत जागावाटपच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत महाआघाडीत सामील झाले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. विधानसभा निवडणुकीत वंचितला महाआघाडीत सामील करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु आहे. मात्र काँग्रेसबरोबर युती करण्यावरून वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ४० जागा देऊ असा प्रस्ताव ठेवला आहे. तर काँग्रेसने हा प्रस्ताव धुडकावून लावत हे अत्यंत गंमतशीर असल्याचं म्हटलंय. त्यामुळे ही युती फिसकटण्याची चर्चा सुरु आहे.

त्यातच आता काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली तर वंचित आघाडी या आघाडीत सहभागी होणार नसल्याची अट वंचितने घातिली असल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा पक्ष समावेश होण्याची चिन्हं कठीण दिसत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लीम मतांची झालेली विभागणीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत पुन्हा पहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.