शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

निवडणुका आल्याने वारी आठवली, अशोक चव्हाण यांची शहा यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 06:02 IST

निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे आता भाजपाध्यक्ष अमित शहा सगळीकडे हिंडू लागतील. आज वारीत आले उद्या आणखी कुठे दिसतील.

मुंबई - निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे आता भाजपाध्यक्ष अमित शहा सगळीकडे हिंडू लागतील. आज वारीत आले उद्या आणखी कुठे दिसतील. वारी आणि पांडुरंग आमच्यासाठी आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. निवडणूक आणि मतांच्या राजकारणासाठी अशी धावाधाव आम्ही करत नाही, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात लगावला.मेळाव्याला राज्यातील महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, आजी-माजी आमदार, खासदार आवर्जून उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव पाटील-निलंगेकर उपस्थित होते. प्रास्ताविकात अशोक चव्हाण म्हणाले की, जनता आॅनलाइन झाली असली, तरी सरकार मात्र आॅफलाइन झाले आहे. चार वर्षांच्या अपयशी कारभारानंतर भाजपाला आणीबाणीची आठवण झाली. मात्र, याच आणीबाणीनंतर १५ वर्षे राज्यात काँग्रेसचे सरकार होते, याचा भाजपाला विसर पडला आहे. चार वर्षांत मोदी सरकारने फक्त पोकळ आश्वासने दिली. त्यांनी काम केले नाही, म्हणून आपोआप आपले सरकार येणार नाही. त्यासाठी नेते, कार्यकर्त्यांना झपाटून काम करावे लागेल. देशाची चार वर्षांची बरबादी थांबविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने, एकोप्याने काम करायला हवे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश कॉँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले.आणीबाणीचा काळ दलितांना वरदान - शिंदेआणीबाणीच्या मुद्द्यावरून होणारी टीका अनाठायी आहे. याच आणीबाणीमुळे दलित व आदिवासींच्या विकासाला चालना मिळाली, हे सत्य विसरता येणार नाही. हरिजन, गिरीजन, वंचित समाजाला विकासाच्या संधी येथून मिळू लागल्या. ज्या बँका दारातही उभे करायच्या नाहीत, तेथे दलित, आदिवासींना कर्जे मिळू लागली, हे वास्तव आहे, असे शिंदे यांनी सांगितले.रस्त्यावर उतरावे लागेल - पृथ्वीराज चव्हाणदेशात आणि राज्यातील सरकारचा साराच कारभार भोंगळ बनला आहे. समाजातील प्रत्येक घटक त्रस्त झाला आहे. ही परिस्थिती बदलायची असेल, तर काँग्रेसला मतभेद विसरावे लागतील. पक्षातील विस्कळीतपणा दूर करून जनतेच्या प्रश्नांवर नेते आणि कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस