शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

घरदार, शेतांवर नांगर फिरवून विकास नको, नाणारमध्ये अशोक चव्हाणांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 14:48 IST

घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी शिवसेनेच्या नाणारबाबतच्या भूमिकेवरही त्यांनी सडकून टीका केली. 

नाणार (रत्नागिरी) - घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी शिवसेनेच्या नाणारबाबतच्या भूमिकेवरही त्यांनी सडकून टीका केली. नाणार येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या सभेत अशोक चव्हाण म्हणाले, नाणारमध्ये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सरकारकडून इंग्रजांपेक्षा जास्त दंडेलशाही सुरू आहे. घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको."नाणारबाबत शिवसेना आणि भाजपाचा वरून कीर्तन आणि आतून तमाशा असे नाटक सुरू असल्याचा टोलही त्यांनी लगावला, ते म्हणाले,"अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगून शिवसेनेला तोंडघशी पाडले. सत्तेमध्ये शिवसेनेची अवस्था एवढी वाईट झाली असतानाही शिवसेना सत्तेत आहे. खरंतर अधिसूचना रद्द करायला १० मिनिटे लागतात. मात्र सुभाष देसाई घोषणा करून १० दिवस उलटल्यानंतरही अद्याप अधिसूचना रद्द झालेली नाही."गुजराती लोकांच्या सत्ताधाऱ्यांशी असलेल्या साट्यालोट्यावरही चव्हाण यांनी टीका केली. "सत्ताधारी पक्षाचे लोक दलाली खाऊन गुजराती लोकांना जमिनी मिळवून देत आहेत. मात्र काँग्रेस पक्ष नाणारवासीयांसोबत मिळून हा लढा लढणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे  काँग्रेस पक्ष लोकांसोबत राहणार आहे. या रिफायनरीच्या माध्यमातून कोकण उध्वस्त करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.  पण कोकणी जनता हे सरकार उद्ध्वस्त करेल, असे अशोक चव्हाण म्हणाले.  

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी