शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

घरदार, शेतांवर नांगर फिरवून विकास नको, नाणारमध्ये अशोक चव्हाणांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 14:48 IST

घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी शिवसेनेच्या नाणारबाबतच्या भूमिकेवरही त्यांनी सडकून टीका केली. 

नाणार (रत्नागिरी) - घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी शिवसेनेच्या नाणारबाबतच्या भूमिकेवरही त्यांनी सडकून टीका केली. नाणार येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या सभेत अशोक चव्हाण म्हणाले, नाणारमध्ये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सरकारकडून इंग्रजांपेक्षा जास्त दंडेलशाही सुरू आहे. घरदार आणि शेतांवर नांगर फिरवून विकास होणार असेल तर आसा विकास आम्हाला नको."नाणारबाबत शिवसेना आणि भाजपाचा वरून कीर्तन आणि आतून तमाशा असे नाटक सुरू असल्याचा टोलही त्यांनी लगावला, ते म्हणाले,"अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगून शिवसेनेला तोंडघशी पाडले. सत्तेमध्ये शिवसेनेची अवस्था एवढी वाईट झाली असतानाही शिवसेना सत्तेत आहे. खरंतर अधिसूचना रद्द करायला १० मिनिटे लागतात. मात्र सुभाष देसाई घोषणा करून १० दिवस उलटल्यानंतरही अद्याप अधिसूचना रद्द झालेली नाही."गुजराती लोकांच्या सत्ताधाऱ्यांशी असलेल्या साट्यालोट्यावरही चव्हाण यांनी टीका केली. "सत्ताधारी पक्षाचे लोक दलाली खाऊन गुजराती लोकांना जमिनी मिळवून देत आहेत. मात्र काँग्रेस पक्ष नाणारवासीयांसोबत मिळून हा लढा लढणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे  काँग्रेस पक्ष लोकांसोबत राहणार आहे. या रिफायनरीच्या माध्यमातून कोकण उध्वस्त करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.  पण कोकणी जनता हे सरकार उद्ध्वस्त करेल, असे अशोक चव्हाण म्हणाले.  

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरी