शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

काष्ठशिल्प कला हीच ‘निंबा’ची ओळख!

By admin | Updated: July 31, 2016 04:15 IST

प्रत्येकाकडे काही ना काही उपजत कलागुण असतात.

विजय मानकर, सालेकसा (गोंदिया)- प्रत्येकाकडे काही ना काही उपजत कलागुण असतात. त्याचा वापर रोजगारासाठी करून त्यातून स्वावलंबी जीवन जगता येते, याचा प्रत्यय गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील निंबा गावात येतो. येथील अनेक युवकांनी काष्ठशिल्पकला आत्मसात करून आणि त्यातून रोजगार मिळवला आहे.राज्याच्या पूर्व टोकावरील शेवटचा तालुका असलेला सालेकसा तसा मागास, दुर्गम, जंगलव्याप्त आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. तालुका मुख्यालयापासून ७ किलोमीटर अंतरावरील निंबा हे दोन हजार लोकवस्तीचे गाव. हे गाव आता काष्ठशिल्पकलेसाठी प्रसिद्ध होत आहे. या गावातील कलाप्रिय बेरोजगार युवकांनी तयार केलेली काष्ठशिल्पं आता राज्याच्या सीमा पार करून दुसऱ्या राज्यातही पोहोचत आहेत.साधारण १६-१७ वर्षापूर्वी या गावात काष्ठशिल्पाचा गंध कुणाला नव्हता. पण गावातील रामलाल चव्हाण यांच्यामुळे ही कला गावात आली आणि रुजली. रामलाल हे एम.कॉम. प्रथम वर्षापर्यंत शिकलेले गावातील एकमेव गृहस्थ. १९९२ ते १९९९ या दरम्यान ते अलाहाबादच्या एका फायनान्स कंपनीसाठी गोंदियात शाखा व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना कंपनीने गुंतवणूकदारांचा गंडा घालून पोबारा केला. त्यामुळे रामलालने थेट आपले गाव निंबा गाठले आणि आपला मुक्काम गावाजवळील शेतात ठोकला. शेतालाच लागून जंगल जंगलात ते भटकंती करू लागले. त्यांना बांबूचे व झाडांचे विविध प्रकारचे ओबडधोबड आकाराचे निरूपयोगी खोड, मूळ नजरेस पडले. रामलाल यांनी ते गोळा करणे सुरू केले. त्यापासून टेबल लॅम्प, साप, विविध प्रकारचे शो-पीस तयार करण्यास सुरुवात केली. हळूहळू या वस्तूंना मोठी मागणी येऊ लागली.आता प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून काष्ठ शिल्पकारांची फौज तयार करु न त्यांना स्वावलंबी करण्यासाठी रामलाल पुढाकार घेत आहेत.>दिल्ली-मुंबईत प्रदर्शनजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून विविध ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनात रामलाल यांच्या काष्ठशिल्पांना प्रदर्शनाची संधी देण्यात आली. त्यामुळे या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध झाली. प्रगती मैदान दिल्ली, मुंबई येथील सरस प्रदर्शन, पुणे, नागपूर, रायपूर आदी शहरांत भरलेल्या प्रदर्शनात निंबा गावात तयार झालेल्या वस्तूंची विक्री झाली.>एव्हाना ही काष्ठशिल्पकला रामलालच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली. अनेकांची पावलं काष्ठशिल्पाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी निंब्याकडे वळू लागली. रामलाल यांनी आपल्या अंगी असलेली ही कला स्वत:पुरती मर्यादित न ठेवता गावातील अनेक युवकांना स्वत:च्या घरीच प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण देणे सुरू केले. त्यातून अनेक युवक या कलेत तरबेज झाले.