शहरं
Join us  
Trending Stories
1
"धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:09 IST

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारल्याच्या मुद्द्यावर वेगवेगळे मत मांडले. वडेट्टीवारांच्या याच विधानावर बोट ठेवत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. 

'दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का?' असा सवाल करत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितेल्या माहितीवरच शंका व्यक्त केली. विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. 'विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे', असे बावनकुळे म्हणाले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

हिंदू टार्गेट केलं जातं हे सिद्ध झालंय -बावनकुळे

"विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातं हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे", असे बावनकुळेंनी म्हटलं आहे. 

वाचा >>एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या

बावनकुळेंनी पुढे म्हटलं आहे, "मग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरत आहेत 'दहशतवादाला जात-धर्म नसतो' असं म्हणून वडेट्टीवार कोणाला खूश करू पाहत आहेत? काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", असा संतप्त सवाल बावनकुळे यांनी केली आहे. 

'दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न' 

"विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा, त्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न दिसतो. हा केवळ बेजबाबदारपणा नाही, तर देशविरोधी मानसिकतेचं उदाहरण आहे", अशी टीका बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्या विधानावर बोलताना केली. 

"देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयानं वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करायला हवा. काँग्रेसचे नेते भारतीयांच्या भावनांशी खेळत आहेत, जखमांवर मीठ चोळत राजकारण करत आहेत, जनता हे विसरणार नाही", असा इशारा बावनकुळेंनी काँग्रेसला दिला. 

मुख्यमंत्री फडणवीसांचीही टीका

'ज्यांच्यासमोर दहशतवाद्यांनी मारलं, त्या नातेवाईकंनी सांगितले आहे. तिथे वडेट्टीवार नव्हते. इथे बसून अशा प्रकारची वक्तव्ये करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणे अतिशय वाईट आहे. याला मुर्खपणा म्हणावं की काय मला समजत नाहीये', अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनीही केली आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाcongressकाँग्रेस