शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:09 IST

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारल्याच्या मुद्द्यावर वेगवेगळे मत मांडले. वडेट्टीवारांच्या याच विधानावर बोट ठेवत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. 

'दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का?' असा सवाल करत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितेल्या माहितीवरच शंका व्यक्त केली. विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. 'विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे', असे बावनकुळे म्हणाले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

हिंदू टार्गेट केलं जातं हे सिद्ध झालंय -बावनकुळे

"विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातं हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे", असे बावनकुळेंनी म्हटलं आहे. 

वाचा >>एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या

बावनकुळेंनी पुढे म्हटलं आहे, "मग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरत आहेत 'दहशतवादाला जात-धर्म नसतो' असं म्हणून वडेट्टीवार कोणाला खूश करू पाहत आहेत? काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", असा संतप्त सवाल बावनकुळे यांनी केली आहे. 

'दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न' 

"विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा, त्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न दिसतो. हा केवळ बेजबाबदारपणा नाही, तर देशविरोधी मानसिकतेचं उदाहरण आहे", अशी टीका बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्या विधानावर बोलताना केली. 

"देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयानं वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करायला हवा. काँग्रेसचे नेते भारतीयांच्या भावनांशी खेळत आहेत, जखमांवर मीठ चोळत राजकारण करत आहेत, जनता हे विसरणार नाही", असा इशारा बावनकुळेंनी काँग्रेसला दिला. 

मुख्यमंत्री फडणवीसांचीही टीका

'ज्यांच्यासमोर दहशतवाद्यांनी मारलं, त्या नातेवाईकंनी सांगितले आहे. तिथे वडेट्टीवार नव्हते. इथे बसून अशा प्रकारची वक्तव्ये करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणे अतिशय वाईट आहे. याला मुर्खपणा म्हणावं की काय मला समजत नाहीये', अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनीही केली आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाcongressकाँग्रेस