शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना, सोशल मीडियावरून आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:15 IST

कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करणारे आमदार ऋतुराज पाटील यांनाच कोरोनाने गाठले आहे.

ठळक मुद्देआमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना सोशल मीडियावरून आवाहन

कोल्हापूर : कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करणारे आमदार ऋतुराज पाटील यांनाच कोरोनाने गाठले आहे.

त्यांनी सोशल मीडियावरून माझी कोविड-१९ चाचणी पॉझीटीव्ह आल्याचे सांगून माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, अशी विनंती केली आहे.एकदा आमचं ठरलंय, कोरोनाला तटवायचं, असं म्हणत ऋतुराज यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन केले होते.

 

कोल्हापुरात आतापर्यंत १६ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांतील आठ हजारांहून जास्त रुग्ण बरे झाले आहेत. शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र आपणच जास्त बेफिकीरीने वागत आहोत. आजही बाजारपेठ, दुकाने, बेकरी अशा अनेक ठिकाणी गर्दी होत आहे.

सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापरही करत नाही, मित्रांसोबत एकत्र गप्पा मारणे, जेवायला एकत्र बसणे, गल्लीच्या कोपऱ्यावर मित्रमंडळी तासन‌्तास गप्पा मारताना दिसतात. ह्यत्याला काय होतंय,ह्ण म्हणत वाढदिवसाला मित्रमंडळी गर्दी करून सेलेब्रेशन करतात.

सुट्टी आहे, वेळ आहे म्हणून पार्ट्या केल्या जातात. कोरोना किती दिवस आहे माहीत नाही, असे म्हणत लग्नाचा मुहूर्त काढून नियमांचे उल्ल्ंघन करून पै-पाहुणे बोलावतात. खेळण्यासाठी आयुष्य आहे; पण आता थोडं थांबू शकत नाही का? अशी विचारणा व्हिडीओच्या माध्यमातून आमदार पाटील यांनी केली होती.

माझी कोविड-१९ चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.- आमदार ऋतुराज पाटील

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRuturaj Patilऋतुराज पाटीलkolhapurकोल्हापूर