शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 06:34 IST

लातुरात ६३ गावांचा संपर्क तुटला, बेळसांगवीला पुराच्या पाण्याचा वेढा, तब्बल ९०० जण अडकले, बचावकार्य सुरू, सोलापूर जिल्ह्यातही पूरस्थिती कायम

छत्रपती संभाजीनगर / मुंबई :पूरस्थिती आणि अतिवृष्टीने रडकुंडीला आलेल्या मराठवाड्याला शनिवारी पुन्हा अतिवृष्टीने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे नद्या-नाल्यांचे पूर ओसरत नाहीत तोच प्रकल्पांमधून विसर्ग सुरू झाल्याने अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती ओढवून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दिवसभर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांनाही पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यात शनिवारी १४१ मंडळाअंतर्गत येणाऱ्या २,८८० गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात किरकोळ, तर उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला.  शुक्रवारी दिवसभरात विभागात एकूण ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस लातुरात ७५.३ मिलिमीटर कोसळला. 

शेतकऱ्यांना ‘निकष’मुक्त हातांनी मदत ! मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

जळगाव : अतिवृष्टीसह पूरस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचा प्रयत्न आहे. निकष व नियमांचा विचार न करता आणि त्यावर बोट न ठेवता नुकसानीची नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बोलताना शनिवारी जळगावच्या विमानतळावर दिली. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी अडचणी येणार नाहीत. टरबूज व काही पिकांसाठी मदतीची तरतूद नाही. सकारात्मक निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. 

सीना नदीला पुन्हा पुराची शक्यता

सोलापूर : अहिल्यानगरसह धाराशिव जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सीना नदीत १ लाख ४० हजार ४६२ क्यूसेक सर्ग करण्यात आला. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगलीहून नवी बचाव पथकेही  आली. ५ दिवसांपूर्वी २ लाख क्यूसेक विसर्ग केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पूर आला होता.

९०० जण अडकले, ६३ गावांचा संपर्क तुटला

लातूर : चार तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीत शनिवारी ६३ गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक पुलांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जळकोटमधील तीन गावांना पुराच्या पाण्याने वेढले असून, बेळसांगवीचे जवळपास ९०० लोक अडकले आहेत. जनावरे वाहून गेली आहेत.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये योग्य निर्णय घेऊ. ही वेळ राजकारण करण्याची नसून, शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची आहे.- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी घेऊन त्यांना कर्जमुक्त करावे. तातडीने हेक्टरी ५० हजारांची मदत द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी. -उद्धव ठाकरे, उद्धवसेना पक्षप्रमुख

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada hit again by heavy rains, Vidarbha and West Maharashtra affected.

Web Summary : Marathwada faces renewed devastation due to heavy rains, impacting 2,880 villages. Vidarbha and West Maharashtra also affected. Farmers will receive assistance without strict criteria, says CM. Rescue operations underway as villages lose contact.
टॅग्स :floodपूरMaharashtraमहाराष्ट्रVidarbhaविदर्भlaturलातूर