शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 06:34 IST

लातुरात ६३ गावांचा संपर्क तुटला, बेळसांगवीला पुराच्या पाण्याचा वेढा, तब्बल ९०० जण अडकले, बचावकार्य सुरू, सोलापूर जिल्ह्यातही पूरस्थिती कायम

छत्रपती संभाजीनगर / मुंबई :पूरस्थिती आणि अतिवृष्टीने रडकुंडीला आलेल्या मराठवाड्याला शनिवारी पुन्हा अतिवृष्टीने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे नद्या-नाल्यांचे पूर ओसरत नाहीत तोच प्रकल्पांमधून विसर्ग सुरू झाल्याने अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती ओढवून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दिवसभर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांनाही पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यात शनिवारी १४१ मंडळाअंतर्गत येणाऱ्या २,८८० गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात किरकोळ, तर उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला.  शुक्रवारी दिवसभरात विभागात एकूण ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस लातुरात ७५.३ मिलिमीटर कोसळला. 

शेतकऱ्यांना ‘निकष’मुक्त हातांनी मदत ! मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

जळगाव : अतिवृष्टीसह पूरस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचा प्रयत्न आहे. निकष व नियमांचा विचार न करता आणि त्यावर बोट न ठेवता नुकसानीची नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बोलताना शनिवारी जळगावच्या विमानतळावर दिली. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी अडचणी येणार नाहीत. टरबूज व काही पिकांसाठी मदतीची तरतूद नाही. सकारात्मक निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. 

सीना नदीला पुन्हा पुराची शक्यता

सोलापूर : अहिल्यानगरसह धाराशिव जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सीना नदीत १ लाख ४० हजार ४६२ क्यूसेक सर्ग करण्यात आला. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगलीहून नवी बचाव पथकेही  आली. ५ दिवसांपूर्वी २ लाख क्यूसेक विसर्ग केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पूर आला होता.

९०० जण अडकले, ६३ गावांचा संपर्क तुटला

लातूर : चार तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीत शनिवारी ६३ गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक पुलांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जळकोटमधील तीन गावांना पुराच्या पाण्याने वेढले असून, बेळसांगवीचे जवळपास ९०० लोक अडकले आहेत. जनावरे वाहून गेली आहेत.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये योग्य निर्णय घेऊ. ही वेळ राजकारण करण्याची नसून, शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची आहे.- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी घेऊन त्यांना कर्जमुक्त करावे. तातडीने हेक्टरी ५० हजारांची मदत द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी. -उद्धव ठाकरे, उद्धवसेना पक्षप्रमुख

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada hit again by heavy rains, Vidarbha and West Maharashtra affected.

Web Summary : Marathwada faces renewed devastation due to heavy rains, impacting 2,880 villages. Vidarbha and West Maharashtra also affected. Farmers will receive assistance without strict criteria, says CM. Rescue operations underway as villages lose contact.
टॅग्स :floodपूरMaharashtraमहाराष्ट्रVidarbhaविदर्भlaturलातूर