शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांची आणखी एक आघाडी फुटली!;विधानसभा निवडणुकीसाठी नवा सारिपाट मांडणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 06:43 IST

‘एमआयएम’सोबत काडीमोड

राजेश शेगोकारअकोला : सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. मात्र, प्रत्येक प्रयोग त्या-त्या निवडणुकीपुरताच ठरला. राज्याच्या राजकारणात दीर्घकालीन सक्षम पर्याय उभा करता आलेला नाही.

भारिप, भारिप-बमसं, रिडालोस, अशा अनेक प्रयोगांनंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी ‘एमआयएम’ला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला. आता ‘वंचित’मधून ‘एमआयएम’ बाहेर पडल्यामुळे ‘वंचित’च्या प्रयोगाला मोठा ‘ब्रेक’ बसला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी ते कोणत्या नव्या भिडूसोबत सत्तेचा सारिपाट मांडतात, याकडे लक्ष लागले आहे. १९८० मध्ये अकोल्यात दाखल झालेल्या अ‍ॅड. आंबेडकरांनी राजकारणामध्ये ‘सामाजिक अभियांत्रिकी’च्या माध्यमातून सत्तेत जाण्याचा यशस्वी प्रयोग केला. प्रारंभी त्यांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षावर काम सुरू केले. १९८४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी याच पक्षावर लढविली. त्यावेळी त्यांचा अवघ्या १३ हजार मतांनी पराभव झाला. पुढे काँग्रेससोबत त्यांनी आघाडी करून लोकसभा गाठली; मात्र लवकरच भारिपचा विस्तार करीत बहुजन महासंघाची जोड देत अकोला पॅटर्नची मुहूर्तमेढ रोवली. या भारिप बहुजन महासंघाने १९९० ते २००४ पर्यंत राज्यात समर्थ पर्याय उभा केला. त्यानंतर मात्र अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाला फारसे यश मिळाले नाही. स्वत: अ‍ॅड. आंबेडकर हे १९९९ नंतर सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीत एकमेव आमदार निवडून आणता आला. २००९ मध्ये १४ पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘रिडालोस’चा ते हिस्सा झाले; मात्र २०१४ मध्ये धनगर, ओबीसी, मुस्लीम यांना एकत्र करीत वंचित बहुजन आघाडीला जन्म दिला. याद्वारे जातनिहाय उमेदवार जाहीर करून वंचित समाजाच्या अस्मितेवर फुंकर घातली. या फुंकरमुळेच राज्यातील नऊ लोकसभा मतदारसंघांत विजयाचे स्वप्न पाहणाºया काँग्रेस आघाडीच्या आशेची ज्योत विझली व ‘वंचित’ची ताकद विधानसभेत किती पडझड करेल, याची गणिते मांडली जाऊ लागली; मात्र याच दरम्यान ‘एमआयएम’ने त्यांची साथ सोडली. ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीच आघाडी संपल्याचे जाहीर केल्यानंतर आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने आता ते आणखी कोणता प्रयोग करतात, याकडे लक्ष लागले आहे.विविध राजकीय प्रयोगआंबेडकरांनी विविध राजकीय प्रयोग केले. कापसाच्या प्रश्नावर डाव्या आघाडीला सोबत घेऊन त्यांनी माकपचे तत्कालीन नेते प्रकाश कारत यांच्यासह मेळावेसुुद्धा घेतले. कधी लहान-मोठ्या संघटनांची मोट बांधली तर कधी विविध समाजांसाठी जागर मेळावे घेऊन बहुजन मतपेढी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन