मुंबई- अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना शासनाकडून मदत जाहीर झाली आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बुधवारी दुपारी मदतीची घोषणा केली. एनडीआरएफच्या निकषानुसार मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेत पीकाच्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर शेतक-यांना ही मदत मिळणार आहे. पीक विमा काढलेल्या शेतक-यांना जास्तीत जास्त रक्कम मिळेल. त्याचप्रमाणे पीक विमा न काढलेल्या शेतक-यांनाही मदत दिली जाईल.
कुठल्या पीकाला किती रक्कम
- ज्वारी, मका गहूसाठी प्रतिहेक्टर 6,800 रुपये मिळणार - सिंचनातील जमिनीसाठी प्रतिहेक्टर 13,500 रुपये मदत दिली जाईल.- मोसंबी, संत्र प्रतिहेक्टर 23,300 रुपये मिळणार. - आंबा प्रतिहेक्टर 36 हजार 700 रुपये मदत दिली जाईल. - केळी प्रति हेक्टर 40 हजार रुपये मदत दिला जाईल. - लिंबू प्रतिहेक्टर 20 हजार रुपये मदत दिली जाईल.- हरभरा, सुर्यफूल प्रतिहेक्टर 6800 रुपये मिळणार.- पीकविमा न काढलेल्यांना प्रतिहेक्टर 18 हजार रुपये मदत दिली जाईल.