शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

हायटेक चारा छावणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अवघ्या आठ दिवसात बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 17:22 IST

चांगला पाऊस पडेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा छावणीतून घेऊन जाऊ नयेत असे आव्हान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायटेक छावणी समजल्या जाणाऱ्या लासूरच्या येथील चारा छावणीच्या भेटीवेळी केले होते.

मोसिन शेख                                                                                                                                                                                        

औरंगाबाद - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. तिथे जनावरांची काय सोय होणार अशी स्थिती आहे. या स्थितीतही अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. मात्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे या चारा छावण्या बंद पडत आहेत. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रातील हायटेक छावणी म्हणून गौरविण्यात आलेली आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेली चारा छावणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आठ दिवसांतच बंद पडली आहे. त्यामुळे सहा हजारहून अधिक जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मराठवाडा म्हणजे १२ महिने दुष्काळ, परंतु आता पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून मागच्या आठवड्यात ही घोषणा केली होती. मात्र, अवघ्या आठ दिवसात पुन्हा फडणवीस यांना याच घोषणेची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. कारण त्यांनी ज्या ठिकाणी आपल्या घोषणांचा पाऊस पाडला, त्याच ठिकाणी ६ हजारपेक्षा अधिक जनावरांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चांगला पाऊस पडेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा छावणीतून घेऊन जाऊ नयेत असे आव्हान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायटेक छावणी समजल्या जाणाऱ्या लासूर येथील चारा छावणीच्या भेटीवेळी केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अवघ्या आठ दिवसात ही चारा छावणी बंद पडली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर मोठ संकट कोसळले आहे. लासूर येथील चारा छावणीत सहा हजारपेक्षा अधिक जनावरांना आमदार प्रशांत बंब आणि बजाज ऑटो, भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने चारा-पाण्याची सोय करण्यात आली होती. मात्र आता ही छावणी अचानक बंद करण्यात आली आहे.

लासूर येथील चारा छावणीबाबत कोणतेही लेखी सूचना न देता संबधीत संस्थांनी चारा छावणी बंद केली आहेत. त्यामुळे, चारा छावणीसाठी नवीन संस्थांनी पुढाकार घेतल्यास  त्यांना लगेच मंजुरी देण्यासाठी  प्रयत्न केला जाईल, असे गंगापूर दुष्काळ समितीचे अध्यक्ष दत्तू कराळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितेले. तर दुसरीकडे, छावणीमध्ये जनावरांच्या संख्येत घट झाली होती. शेतकऱ्यांनी आपली जनावरे घरी घेऊन गेल्याने छावणी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, बजाज ऑटोचे सी.पी. त्रिपाठी म्हणाले.

शेतकरी म्हणतात..

मी बाभूळगाव  येथील शेतकरी असून , माझे दहा जनावरे आहेत मात्र चारा छावणी चालकांनी घरी घेऊन जाण्याचे सांगितले. चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. थोडेफार पैसे होते, मात्र ते बियाणे घेण्यासाठी लागणार आहे.त्यामुळे आठ दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. असे लक्ष्मण सोनवणे  म्हणाले.