शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

हायटेक चारा छावणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अवघ्या आठ दिवसात बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 17:22 IST

चांगला पाऊस पडेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा छावणीतून घेऊन जाऊ नयेत असे आव्हान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायटेक छावणी समजल्या जाणाऱ्या लासूरच्या येथील चारा छावणीच्या भेटीवेळी केले होते.

मोसिन शेख                                                                                                                                                                                        

औरंगाबाद - दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. तिथे जनावरांची काय सोय होणार अशी स्थिती आहे. या स्थितीतही अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. मात्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे या चारा छावण्या बंद पडत आहेत. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रातील हायटेक छावणी म्हणून गौरविण्यात आलेली आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेली चारा छावणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आठ दिवसांतच बंद पडली आहे. त्यामुळे सहा हजारहून अधिक जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मराठवाडा म्हणजे १२ महिने दुष्काळ, परंतु आता पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून मागच्या आठवड्यात ही घोषणा केली होती. मात्र, अवघ्या आठ दिवसात पुन्हा फडणवीस यांना याच घोषणेची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. कारण त्यांनी ज्या ठिकाणी आपल्या घोषणांचा पाऊस पाडला, त्याच ठिकाणी ६ हजारपेक्षा अधिक जनावरांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चांगला पाऊस पडेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा छावणीतून घेऊन जाऊ नयेत असे आव्हान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायटेक छावणी समजल्या जाणाऱ्या लासूर येथील चारा छावणीच्या भेटीवेळी केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अवघ्या आठ दिवसात ही चारा छावणी बंद पडली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर मोठ संकट कोसळले आहे. लासूर येथील चारा छावणीत सहा हजारपेक्षा अधिक जनावरांना आमदार प्रशांत बंब आणि बजाज ऑटो, भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने चारा-पाण्याची सोय करण्यात आली होती. मात्र आता ही छावणी अचानक बंद करण्यात आली आहे.

लासूर येथील चारा छावणीबाबत कोणतेही लेखी सूचना न देता संबधीत संस्थांनी चारा छावणी बंद केली आहेत. त्यामुळे, चारा छावणीसाठी नवीन संस्थांनी पुढाकार घेतल्यास  त्यांना लगेच मंजुरी देण्यासाठी  प्रयत्न केला जाईल, असे गंगापूर दुष्काळ समितीचे अध्यक्ष दत्तू कराळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितेले. तर दुसरीकडे, छावणीमध्ये जनावरांच्या संख्येत घट झाली होती. शेतकऱ्यांनी आपली जनावरे घरी घेऊन गेल्याने छावणी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, बजाज ऑटोचे सी.पी. त्रिपाठी म्हणाले.

शेतकरी म्हणतात..

मी बाभूळगाव  येथील शेतकरी असून , माझे दहा जनावरे आहेत मात्र चारा छावणी चालकांनी घरी घेऊन जाण्याचे सांगितले. चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. थोडेफार पैसे होते, मात्र ते बियाणे घेण्यासाठी लागणार आहे.त्यामुळे आठ दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. असे लक्ष्मण सोनवणे  म्हणाले.