शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"...अन् आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या गळात गळे टाकून पदयात्रा करतात; स्वर्गात बाळासाहेबांना काय वाटत असेल?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 23:40 IST

Devendra Fadnavis : रक्तानं कदाचित एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कुणी नसतील, पण विचारानं एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा चालवत आहेत.

 मला एका गोष्टीचे अतिशय वाईट वाटते, की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जो जाज्वल्य अभिमान बाळासाहेब ठाकरे यांना होता, कुणीही एक शब्दही बोलला तर त्याला चपखल अशा पद्धतीचं उत्तर मिळत होतं. ते कृतीतुनही मिळत होतं आणि शब्दांतूनही मिळत होतं. मत्र आता, हिंगोलीत राहुल गांधी सावरकरांबद्दल एवढं नीच बोलतात आणि त्यांच्या गळात गळे टाकून आदित्य ठाकरे जेव्हा पदयात्रा करतात... बरं आमचं सोडून द्या, मी विचार केल्यावर मला असं वाटतं, की त्या ठिकाणी स्वर्गात बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल? जेव्हा ते बघत असतील, की त्या राहुल गांधीसोबत आदित्य ठाकरे पदयात्रा करतायत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. 

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नुकतीच आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यानंतर आदित्य ठाकरे आणि राहुल गांधींच्या गळाभेटीचे फोटोही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले होते. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "ठीक आहे तुमचं-आमचं पटलं नसेल. तुम्ही विचार सोडला म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं. पण तुम्ही आम्हाला सोडा, आम्हाला शिव्या द्या. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करत असाल तर, बाळासाहेबांशी नात सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का?" असा सवालही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना केला आहे.

फडणवीस म्हणाले, “बाळासाहेबांशी नातं हे रक्तानी होत नाही, ते विचाराने करावं लगातं. विचारांचं नातं हे बाळासाहेबांशी खरं नातं आहे. आणि जो-जो विचारांचं नात याठिकाणी सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल, म्हणून तर याठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली. कारण हे विचाराचं नातं आहे. रक्तानं कदाचित एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कुणी नसतील, पण विचारानं एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा चालवत आहेत. म्हणूनच हे त्यांच्या कुटुंबातील आहेत”.

एवढेच नाही, तर “बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देताना आपण निर्धार करूया की, ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, तो विचार मोडू दिला जाणार नाही. काय वाटेल ते झालं तरी तो विचार जिवंत राहिल आणि जोपर्यंत सावरकरांना आपमानित करणारे देशामध्ये आहेत, या सगळ्या अपमानित करणाऱ्यांचा विचार जमीनीत गाढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार आपण सर्व जण करू, असेही देवेंद्र फडणवी यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAditya Thackreyआदित्य ठाकरे