शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"...अन् आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या गळात गळे टाकून पदयात्रा करतात; स्वर्गात बाळासाहेबांना काय वाटत असेल?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 23:40 IST

Devendra Fadnavis : रक्तानं कदाचित एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कुणी नसतील, पण विचारानं एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा चालवत आहेत.

 मला एका गोष्टीचे अतिशय वाईट वाटते, की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जो जाज्वल्य अभिमान बाळासाहेब ठाकरे यांना होता, कुणीही एक शब्दही बोलला तर त्याला चपखल अशा पद्धतीचं उत्तर मिळत होतं. ते कृतीतुनही मिळत होतं आणि शब्दांतूनही मिळत होतं. मत्र आता, हिंगोलीत राहुल गांधी सावरकरांबद्दल एवढं नीच बोलतात आणि त्यांच्या गळात गळे टाकून आदित्य ठाकरे जेव्हा पदयात्रा करतात... बरं आमचं सोडून द्या, मी विचार केल्यावर मला असं वाटतं, की त्या ठिकाणी स्वर्गात बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल? जेव्हा ते बघत असतील, की त्या राहुल गांधीसोबत आदित्य ठाकरे पदयात्रा करतायत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. 

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नुकतीच आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यानंतर आदित्य ठाकरे आणि राहुल गांधींच्या गळाभेटीचे फोटोही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले होते. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "ठीक आहे तुमचं-आमचं पटलं नसेल. तुम्ही विचार सोडला म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं. पण तुम्ही आम्हाला सोडा, आम्हाला शिव्या द्या. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करत असाल तर, बाळासाहेबांशी नात सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का?" असा सवालही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना केला आहे.

फडणवीस म्हणाले, “बाळासाहेबांशी नातं हे रक्तानी होत नाही, ते विचाराने करावं लगातं. विचारांचं नातं हे बाळासाहेबांशी खरं नातं आहे. आणि जो-जो विचारांचं नात याठिकाणी सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल, म्हणून तर याठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली. कारण हे विचाराचं नातं आहे. रक्तानं कदाचित एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कुणी नसतील, पण विचारानं एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा चालवत आहेत. म्हणूनच हे त्यांच्या कुटुंबातील आहेत”.

एवढेच नाही, तर “बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देताना आपण निर्धार करूया की, ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, तो विचार मोडू दिला जाणार नाही. काय वाटेल ते झालं तरी तो विचार जिवंत राहिल आणि जोपर्यंत सावरकरांना आपमानित करणारे देशामध्ये आहेत, या सगळ्या अपमानित करणाऱ्यांचा विचार जमीनीत गाढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार आपण सर्व जण करू, असेही देवेंद्र फडणवी यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAditya Thackreyआदित्य ठाकरे