शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

“हे पाहिल्यानंतर मी तरी कधीही मास्क विसरणार नाही”; आनंद महिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 13:25 IST

उद्योजक आनंद महिंद्रांनी एक व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देआनंद महिंद्रांचे ट्विटमास्कसंदर्भात केले भाष्यपोलिसांनी शिक्षा केलेल्याचा व्हिडिओ ट्विट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोनाचे थैमान सुरूच असून, मागील ४८ दिवसांत मुंबईत एकूण ८५ हजार करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील काही ठिकाणी लॉकडाऊनची स्थिती उत्पन्न झाली आहे. यातच उद्योजक आनंद महिंद्रांनी एक व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. (anand mahindra react on face mask)

आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊ नये, करोना संसर्गावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून त्रिसुत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही काहीजण याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अशा बेजबाबदार नागरिकांना धडा शिकवण्यासाठी मुंबई पोलिसांनी चक्क त्याप्रमाणे शिक्षा देण्यास सुरुवात केलीय. याचाच एक व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर शेअर केला आहे. 

लवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील: भाजप खासदाराचा टोला

मी कधीच माझं मास्क विसरणार नाही

मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे तोंडावर मास्क घालण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी अशाप्रकारे कोंबडा बनवून चालवत शिक्षा केली. मला हा व्हिडिओ सिग्नल अॅपवर मिळाला. मी बोर्डींग स्कूलमध्ये होतो, तेव्हा अशी शिक्षा ही सामान्य गोष्ट होती. थोडी मजेदार पण हे असं चालताना खूप थकायला व्हायचं. हे पाहून मी कधीच माझं मास्क विसरणार नाही, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये मुंबईच्या मरिन ड्राइव्हर काही जणांना पोलिसांनी बेडुक उड्यांप्रमाणे चालण्यास सांगितल्याची शिक्षा केल्याचे आणि त्यांच्यावर एक पोलीस हवालदार लक्ष ठेवत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, देशातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होत असून त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, नांदेड, औरंगाबाद, नागपूर या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. शिवाय, दिल्ली आणि बेंगळूरु शहरामध्येही करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील संसर्गदर २३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्या खालोखाल पंजाब (८.८२ टक्के), छत्तीसगढ (८ टक्के), मध्य प्रदेश (७.८२ टक्के), तमिळनाडू (२.५० टक्के), कर्नाटक (२.४५ टक्के), गुजरात (२.२ टक्के), दिल्ली (२.०४ टक्के) या राज्यांमध्येही संसर्गदर एक टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसAnand Mahindraआनंद महिंद्रा