शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

Maharashtra Politics: “‘हर हर महादेव’ चित्रपट बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिला का, त्यांना वादात का ओढत आहात?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:02 IST

Maharashtra News: तुमच्याबरोबर जाहीर चर्चा करायला आम्ही तयार आहोत. तुम्ही आहात का, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे.

Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-भाजप सरकार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. यातच ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांना विरोध वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत आक्रमक झाली असून, राज्यातील काही ठिकाणी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. यावरून आता राष्ट्रवादीवर टीका करण्यात येत आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादात बाबासाहेब पुरंदरे यांना का ओढता आहात? बाबासाहेब पुरंदरे यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे का? अशी विचारणा करण्यात आली आहे. 

‘हर हर महादेव’ चित्रपटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. या चित्रपटाचा ठाण्यातील शो बंद पाडण्यात आला होता. यातच आता ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली असून, राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केला आहे. या सिनेमाला सर्वात प्रथम विरोध आम्ही केला, असा दावाही आनंद दवे यांनी केला. 

फक्त पुरंदरेच दिसतात का तुम्हाला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे बाबासाहेबांचे कौतुक केले होते, त्याबाबत काय बोलणार आहात? राजांना सेक्युलर ठरवण्याचे पाप तुम्ही आणि तुमचे सहकारी वारंवार करत आहात? द्याल का पुरावे? स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना हाल हाल करून मारणाऱ्या औरंगजेबाच्या जातीवर कधी बोलणार आहात? का फक्त पुरंदरेच दिसतात तुम्हाला? द्या याची उत्तरे. आम्ही तयार आहोत तुमच्या बरोबर जाहीर चर्चा करायला. तुम्ही तयार आहात का चर्चेला? असे खुले आव्हान आनंद दवे यांनी दिले आहे. 

चित्रपटाच्या आडून जातीय राजकारण का करता आहात?

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादात बाबासाहेब पुरंदरे यांना का ओढता आहात? बाबासाहेब पुरंदरे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे का? बाबासाहेबांच्या कोणत्या लेखात असा उल्लेख आहे? चित्रपटाच्या आडून जातीय राजकारण का करता आहात? तुम्हाला जागे व्हायला संभाजी राजे यांचे वक्तव्य यावे लागले? चित्रपट चुकला आहे हे निश्चितच. पण त्या आडून घाणेरडे जातीय राजकारण करू नका. इतकी वर्ष सत्तेत आहात. का नाही एक समिती स्थापन केली खरा इतिहास शोधायला? असा थेट सवाल आनंद दवे यांनी केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Babasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस