शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

Amruta Fadanvis : अमृता फडणवीस संतापल्या, राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाणांना पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 16:23 IST

Amruta Fadanvis : भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने रश्मी ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती.

मुंबई: भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने रश्मी ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. अमृता यांनी त्यांच्या ट्विटरवरुन ही माहिती दिली.

विद्या चव्हाण यांना पाठवलेल्या नोटीसचे फोटो ट्विटरवर शेअर करत अमृता फडणवीस यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली. 'आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतःला, मगच मिळेल तुला निर्वाण,'अशा शब्दात अमृता यांनी विद्या चव्हाण यांच्यावर पलटवार केला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या जितेन गजारिया याने रश्मी ठाकरेंना राबडी देवीची उपमा दिली होती. त्यानंतर शिवसेनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर पोलिसांनी जितेनला अटक केली. जितेन हा भाजपचा आयटी सेलचा प्रमुख असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्या टिप्पणीवरुन राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती.  

काय म्हणाल्या विद्या चव्हाण ?'भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने राबडीदेवीचे उदाहरण दिले असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचे भाग्य मिळाले. बरं झाले देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये, असं विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या.

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना