शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

अमरावती - वनविभागात ‘कॅम्पा’ निधीतून आलिशान वाहनांची खरेदी !

By admin | Updated: August 19, 2016 17:55 IST

केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाने राज्याच्या वनविभागाला पाच वर्षांपूर्वी ‘कॅम्पा’ निधीतून ११०० कोटी रुपये वनसंवर्धनासाठी दिले होते.

गणेश वासनिक/ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. १९ :  केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाने राज्याच्या वनविभागाला पाच वर्षांपूर्वी ‘कॅम्पा’ निधीतून ११०० कोटी रुपये वनसंवर्धनासाठी दिले होते. मात्र, या निधीचा वापर महागड्या वाहनांची खरेदी, आलिशान बंगले, प्रशस्त कार्यालयांची निर्मिती, वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या सेवा-सुविधांवर खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. निधीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी राज्याच्या लोकलेखा समितीने गंभीर आक्षेप घेतला आहे.

केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण विभागाने सन २००२ मध्ये ‘कॅम्पेन सेटरी अ फॉरेस्ट रेशन मॅनेजमेंट अ‍ॅन्ड प्लॅनिंग अ‍ॅथॉरिटी’ (कॅम्पा) ला मंजुरी दिली आहे. या प्राधिकरणाकडे प्रामुख्याने ज्या वनजमिनी वनेत्तर कामांसाठी वापरल्या जातात, त्या वनजमिनींचे नक्तमूल्य (नेट प्रेझेंट व्हॅल्यू) वसूल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वनेत्तर कामांसाठी वापरण्यात आलेल्या वनजमिनीतून मिळालेली रक्कम ही रोपवनांच्या कामी वापरण्यास प्राधान्यक्रम देणे ही नियमावली आहे. त्यानुसार राज्यात ४३ हजार हेक्टर वनजमिनी वनेत्तर कामांसाठी वापरण्यात आल्या असून त्यापोटी ११०० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने ‘कॅम्पा’ निधीचे ११०० कोटी रुपये सन २०१० मध्ये राज्याच्या वनविभागाकडे वनसंवर्धनासाठी पाठविले. मात्र, तत्कालीन वनमंत्री तथा वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी ‘कॅम्पा’ निधीचा वापर वनसंवर्धन आणि रोपवनांच्या कामी अत्यंत कमी वापरण्यात आला आहे. राज्याच्या भारतीय वनसेवेच्या अधिकाऱ्यांनी आलिशान ४५ वाहनांची खरेदी करण्याचा प्रताप केला आहे. आयएफएस अधिकाऱ्यांना पाच लाखांच्या वर वाहने खरेदी करता येत नाहीत. तरीदेखील जास्त रकमेची वाहने खरेदी करायची असल्यास त्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. परंतु सन २०१०-११ मध्ये कोणतेही मान्यता न घेता आलिशान वाहने खरेदी करण्यात आलीत. ही बाब लोकलेखा समितीच्या निदर्शनास तपासणीदरम्यान उघडकीस आली आहे.

वनसंवर्धनासाठी कोणताही वापर होत नसताना या वाहनांची खरेदी केली कशी, असा आक्षेप लोकलेखा समितीने घेतला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी अलिशान वाहने खरेदी केलीत; त्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून रक्कम का वसूल करू नये, असेदेखील लोकलेखा समितीने म्हटले आहे. याप्रकरणी शासनाला लोकलेखा समितीने सविस्तर अहवाल मागविला असून नियमबाह्य खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश समितीने दिले आहेत. मंत्रिमंडळाची मान्यता न घेता ‘कॅम्पा’ निधीचा दुरुपयोग तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्या कार्यकाळात झाल्याचे स्पष्ट होत आहे. वनकर्मचाऱ्यांच्या जुनाट, जीर्ण निवासस्थानांकडे दुर्लक्षराज्यातील आयएफएस अधिकाऱ्यांनी ‘कॅम्पा’ निधीची वाट लावल्याची बाब उघडकीस आली आहे. अनावश्यक वाहनांची खरेदी, प्रशस्त कार्यालये व बंगल्याची निर्मिती करताना आयएफएस अधिकाऱ्यांना वनमजूर, वनपाल, वनरक्षकांची जीर्ण व जुनाट झालेली निवासस्थाने दुरुस्त करण्याचे सौजन्य का दाखविले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.वसतिगृह निर्मितीची संकल्पना गुंडाळलीराज्याच्या ३५ जिल्ह्यांमध्ये दुर्गम, अतिदुर्गम भागात काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह साकारण्याची संकल्पना तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी समोर आणली होती. मात्र, या संकल्पनेला त्यानंतरच्या वनमंत्र्यांनी मुठमाती देत ‘कॅम्पा’ निधीचा वापर अन्य कामांसाठी करण्यात आला आहे.वनविभागात ‘कॅम्पा’ निधीचा गैरवापर झाल्याबाबतचा आक्षेप लोकलेखा समितीने घेतल्याची माहिती मिळाली आहे. समितीने चौकशी केली असता ही बाब तीन वर्षांपूर्वी उघडकीस आली आहे. याप्रकरणी सत्यता तपासली जात असून नियमबाह्य आढळल्यास कारवाई केली जाईल.- सुधीर मुंनगंटीवार,  अर्थ, वने मंत्रीराज्याच्या आयएफएस अधिकाऱ्यांनी सन २०१० मध्ये ‘कॅम्पा’ निधीचा दुरूपयोग करून अनावश्यक खर्च केल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. वनसंवर्धन कामांना ठेंगा दाखविला गेला आहे.- दिलीप कापशीकर, उपाध्यक्ष, केंद्रीय वनरक्षक, वनपाल पदावनत संघटना