शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

Wait and Watch! अजितदादांशी बरोबरी करू नका; कोल्हेंच्या टीकेवर अमोल मिटकरींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 11:16 AM

लोकसभेच्या तोंडावर इतकं पळपळ पळावं लागत असेल तर हेच अजित पवारांचे वेगळेपण आहे असा टोला मिटकरींनी लगावला.

अकोला - खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने बारामतीत जाऊन अजित पवारांवर थेट निशाणा साधला. सर्कशीतला वाघ रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर चालतो असं विधान कोल्हेंनी अजितदादांचे नाव न घेता केले. त्यावर आमदार अमोल मिटकरींनी पलटवार करत अजितदादांनी तुम्हा दोघांना कामाला लावलंय. बारामतीतील जनता हुशार, येणाऱ्या काळात काय करायचे हे त्यांना चांगले माहिती आहे असं म्हणत अमोल मिटकरींनी कोल्हेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. 

आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, कोल्हेंसारख्या अतिसामान्य माणसाला शिरूरमध्ये निवडणूक लढवायला लावत तिथे तुम्हाला वाघ बनवणाऱ्या अजित दादांवर तुम्ही काटेवाडीत जाऊन सर्कशीतील वाघाशी तुलना करता, तेव्हा आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्व आणि उत्तुंग बुद्धिमत्तेवर मला हसावं वाटतं. ज्या काटेवाडीत तुम्ही उभे होता. तिथे सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात कामं होतायेत. बारामतीत चक्कर मारताना तिथले एसटी स्टँडही बघा. कोण सर्कशीतला आणि कोण जंगलातला वाघ आहे हे दिल्लीश्वरापासून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. या देशात, महाराष्ट्रात विकासाचा वादा म्हणजे अजितदादा आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ४ वर्ष आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रकट झाला नाहीत. पण आपल्याला आणि सुप्रिया सुळे या दोन्ही खासदारांना मिळून संघर्ष यात्रा काढावी लागत असेल आणि लोकसभेच्या तोंडावर इतकं पळपळ पळावं लागत असेल तर हेच अजित पवारांचे वेगळेपण आहे. अजितदादांनी तुम्हाला कामाला लावलंय. त्यामुळे यापुढे अजित पवारांवर बोलताना थोडं सबुरीने घ्या. अन्यथा आपल्या बाबतीत तरूण महाराष्ट्रात जसं विचार करतायेत. तुम्ही अजित पवारांवर अशी टीका कराल तर कदाचित तरुणाई ते खपवून घेणार नाही. बारामतीतील लोक हुशार आहेत. त्यांना येणाऱ्या काळात काय केले पाहिजे हे माहिती आहे. त्यामुळे वेट अँन्ड वॉच, अजितदादा हा विकासाचा वादा आहे तुम्ही त्यांच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका असं अमोल मिटकरींनी कोल्हेंना बजावलं आहे. 

काय म्हणाले होते अमोल कोल्हे?वाघ आपल्याला लय आवडतो. पण वाघ जेव्हा जंगलात फिरत असतो तेव्हा तो आपल्याला जंगलाचा राजा वाटतो. पण सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करत असतो तेव्हा काळजाला वेदना होतात. कारण ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केले त्याला आज रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर चालावं लागतं. जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात उभं राहिलेला बघतो तेव्हा आणखी काळजाला वेदना होतात. कारण या वाघाच्या डरकाळीनं भल्याभल्यांचा थरकाप उडत होता. आज त्याला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागतं. कुणीही येणारे जाणारे त्याला दगड मारू शकते ही भावना जेव्हा वाघाची होते. असेच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघाची डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाहीत तेव्हा ही भावना नक्कीच जागी होती असं त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता म्हटलं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेAmol Mitkariअमोल मिटकरीSupriya Suleसुप्रिया सुळे