शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 12:44 IST

Maharashtra Political Crisis: एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात एकीकडे संजय राऊतांवर ईडीने कारवाई करत केलेली अटक, नव्या शिंदे-भाजप सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलेल्या विधानावरून देशभरातील वातावरण ढवळून निघताना दिसत आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत, याचाच धागा पकडून, मंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का, अशी विचारणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. 

देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील. कोणताही पक्ष भाजपला मात देऊ शकत नाही, असा दावा जेपी नड्डा यांनी केला होता. यानंतर, भाजपवर सडकून टीका केली जात आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 

मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?

प्रादेशिक पक्ष राज्यांतर्गत अस्मिता जपण्याचे काम करत असतात. त्यांना संपवण्याची आसुरी महत्त्वाकांक्षा भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहीर केली आहे. हा छुपा अजेंडा सत्तेत आल्यापासून भाजप राबवत आहेच... तरी आता उघडपणे बोलण्यापर्यंत भाजप अध्यक्षांची मजल गेली आहे. मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील तर जे. पी. नड्डांच्या वक्तव्याचा निषेध करत आपल्या पक्षाची अस्मिता जपण्यासाठी भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत ते आता दाखवणार का?, अशी थेट विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार?

JP "नड्डा" जे बोलले ते वक्तव्य भविष्यात भाजपसाठीच मोठा "खड्डा" ठरेल .त्यांना वाटते तितकी सोपी ही गोष्ट नाही .या देशात हुकूमशाही नाही तुम्हीं कितीही फडफड केली तरी संविधानाला धक्का लाऊ शकणार नाही. हे लक्षात ठेवा, अशी टीका अमोल मिटकरींनी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांनी केलेले विधान आणि नड्डा यांच्या वक्तव्यावरून सावरून घेण्याचा प्रयत्न केला. यावरही अमोल मिटकरींनी टोला लगावला आहे. राज्यपालांना तसं म्हणायचं नव्हतं, नड्डाजींना तसं म्हणायचं नव्हतं, एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार, असा खोचक सवालही मिटकरींनी केला आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmol Mitkariअमोल मिटकरीBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे