शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 12:44 IST

Maharashtra Political Crisis: एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात एकीकडे संजय राऊतांवर ईडीने कारवाई करत केलेली अटक, नव्या शिंदे-भाजप सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलेल्या विधानावरून देशभरातील वातावरण ढवळून निघताना दिसत आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत, याचाच धागा पकडून, मंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का, अशी विचारणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. 

देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील. कोणताही पक्ष भाजपला मात देऊ शकत नाही, असा दावा जेपी नड्डा यांनी केला होता. यानंतर, भाजपवर सडकून टीका केली जात आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 

मुख्यमंत्री ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील, तर भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत दाखवणार का?

प्रादेशिक पक्ष राज्यांतर्गत अस्मिता जपण्याचे काम करत असतात. त्यांना संपवण्याची आसुरी महत्त्वाकांक्षा भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी जाहीर केली आहे. हा छुपा अजेंडा सत्तेत आल्यापासून भाजप राबवत आहेच... तरी आता उघडपणे बोलण्यापर्यंत भाजप अध्यक्षांची मजल गेली आहे. मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील तर जे. पी. नड्डांच्या वक्तव्याचा निषेध करत आपल्या पक्षाची अस्मिता जपण्यासाठी भाजपसोबतची युती तोडण्याची हिंमत ते आता दाखवणार का?, अशी थेट विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार?

JP "नड्डा" जे बोलले ते वक्तव्य भविष्यात भाजपसाठीच मोठा "खड्डा" ठरेल .त्यांना वाटते तितकी सोपी ही गोष्ट नाही .या देशात हुकूमशाही नाही तुम्हीं कितीही फडफड केली तरी संविधानाला धक्का लाऊ शकणार नाही. हे लक्षात ठेवा, अशी टीका अमोल मिटकरींनी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांनी केलेले विधान आणि नड्डा यांच्या वक्तव्यावरून सावरून घेण्याचा प्रयत्न केला. यावरही अमोल मिटकरींनी टोला लगावला आहे. राज्यपालांना तसं म्हणायचं नव्हतं, नड्डाजींना तसं म्हणायचं नव्हतं, एकटे देवेंद्रजी कोणाकोणाला वाचवणार, असा खोचक सवालही मिटकरींनी केला आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmol Mitkariअमोल मिटकरीBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे