शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

अमित देशमुख यांच्याकडे औरंगाबाद, उस्मानाबादचे संपर्कमंत्रीपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 10:37 IST

कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वाजीत कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

मुंबई - राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीनंतर अनपेक्षीतपणे सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्र्यांची विविध जिल्ह्यांच्या संपर्कमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे अहमदनगर व नाशिकचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. तर लातुरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे परभणी, जालना आणि बीडच्या संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. उर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे अकोल, वाशीम संपर्कमंत्रीपद, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वेडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली, यवतमाळ आणि रायगडचे संपर्कमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. 

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर बुलडाणा, गोंदिया तर हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबई उपनगर तसेच वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांना पुण्याचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांना पुण्याचे, नंदूरबारचे पालकमंत्री के.सी. पडवी यांना धुळे, पालघरचे संपर्कमंत्रीपद, कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वाजीत कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.