शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

अमित देशमुख यांच्याकडे औरंगाबाद, उस्मानाबादचे संपर्कमंत्रीपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 10:37 IST

कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वाजीत कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

मुंबई - राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीनंतर अनपेक्षीतपणे सत्तेवर आलेल्या काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्र्यांची विविध जिल्ह्यांच्या संपर्कमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे अहमदनगर व नाशिकचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. तर लातुरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे परभणी, जालना आणि बीडच्या संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. उर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे अकोल, वाशीम संपर्कमंत्रीपद, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वेडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली, यवतमाळ आणि रायगडचे संपर्कमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. 

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर बुलडाणा, गोंदिया तर हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबई उपनगर तसेच वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांना पुण्याचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांना पुण्याचे, नंदूरबारचे पालकमंत्री के.सी. पडवी यांना धुळे, पालघरचे संपर्कमंत्रीपद, कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना सातारा, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वाजीत कदम यांच्यावर सांगली, सोलापूरच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.