शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

महाआघाडीत आंबेडकरांचे स्वागत, मनसेला स्थान नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 06:51 IST

महाआघाडी मूलभूत विचारसरणीच्या आधारावर उभी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आघाडीत घ्या, असे कुणी म्हटले तर ते शक्य आहे का, असा सवाल करीत राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत स्थान नसेल

- राजा मानेमुंबई : महाआघाडी मूलभूत विचारसरणीच्या आधारावर उभी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आघाडीत घ्या, असे कुणी म्हटले तर ते शक्य आहे का, असा सवाल करीत राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत स्थान नसेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागा वाटप, देशातील राजकारण, मोदी सरकार, अर्थसंकल्प, अण्णा हजारेंचे उपोषण आदी विषयांवर खा. चव्हाण यांनी ‘लोकमत’शी सविस्तर बातचित केली. जागा वाटपाबाबत अजित पवारांसोबत चर्चा झाली, त्यानुसार जी जागा त्यांना सोयीची वाटते ती त्यांनी घेतली पाहिजे, जी आम्हाला सोयीची आहे ती आम्ही घेतली पाहिजे. याबाबत अंतिम चर्चा बाकी असून मी ठेवलेला प्रस्ताव त्यांनाही मान्य आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आम्ही नुकतेच भेटलो. त्यांनी १२ जागा मागितल्या आहेत. एवढ्या जागा देणे शक्य नाही. पण आम्ही योग्य जागा सोडू. शिवाय, सीपीआय, सीपीएम, राजू शेट्टी, कवाडे यांची आरपीआय यांसारख्या ७-८ पक्षांशी आमची बोलणी झाली आहे. संभाजी ब्रिगेडची काँग्रेसला पाठिंबा देण्याची इच्छा आहे. त्यांनाही सोबत घेऊ. जागावाटप करताना समजा ८ जागा, आम्ही इतर पक्षांना दिल्या, तर त्यापैकी ४ जागा राष्ट्रवादी देईल व ४ जागा आम्ही देऊ. जागा वाटपात घटक पक्षांना समान न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या निवडणुकीत ७० टक्के मते भाजप-सेनेच्या विरोधात राहिली आहेत. केवळ ३० टक्के मतांवर भाजपा-सेनेचं सरकार आलं. त्यामुळे सर्वच समविचारी पक्षांना आघाडीत घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. राज्यात काँग्रेस आघाडीला पोषक वातावरण आहे. जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून मी गेल्या ६ महिन्यांमध्ये सर्वच जिल्ह्यात फिरलोय. काँग्रेसला पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.ही तर शेतकऱ्यांची थट्टाच!अल्पभूधारक शेतकºयांना वार्षिक सह हजार रुपये अनुदान केंद्र सरकार देणार आहे. दिवसाला १७ रुपये देणे ही शेतकºयांची थट्टाच आहे. किमान आधारभूत किंमतीवर राज्य सरकारकडून शेतमाल खरेदी केला जाईल, असे आश्वासन भाजपाने दिले होते. त्याचे काय झाले? कर्जमाफीचे पैसे अद्याप शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMNSमनसे