शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

औरंगाबादच्या राजकारणात अखेर अंबादास दानवेंचा उदय !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 11:00 AM

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शब्द औरंगाबादच्या राजकारणात मागील कित्येक वर्षांपासून प्रमाण मानला जायचा. परंतु, त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे अपसुकच अंबादास दानवे यांचे महत्त्व वाढणार आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत तब्बल चार वेळा निवडून आलेल्या चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादमधून पराभव झाल्यामुळे मराठवाड्यातून शिवसेनेची पिछेहाट तर सुरू झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. परंतु, अशा परिस्थितीत शिवसेनेचे दुसऱ्या फळीतील नेते अंबादास दानवे यांनी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विजय मिळाला. या विजयामुळे अनेक वर्षांच्या खडतर परिश्रमानंतर दानवे यांचा अखेर औरंगाबादच्या राजकारणात उदय झाला.

मागील कित्येक वर्षांपासून औरंगाबादच्या राजकारणात स्थिरावू पाहणाऱ्या अंबादास दानवे यांच्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. तोही अशा वेळी जेव्हा जिल्ह्यातील मातब्बर नेते चंद्रकांत खैरे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहे. दानवे यांच्या विजयासाठी युतीने पूर्ण सहकार्य केले. त्यामुळे दानवे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला.

औरंगाबाद-जालना विधान परिषद जागेसाठीच्या निवडणुकीत काँग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांचा पराभव झाला. गेल्यावेळी काँग्रेसकडे असलेली ही जागा शिवसेनेने परत आपल्याकडे खेचून आणली. वास्तविक पाहता औरंगाबाद आणि जालना जिल्हा परिषदेत शिवसेनेची काँग्रेस युती होती. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रोष होता. अशा स्थितीत दानवे यांच्यासोबत दगाफटका होण्याची शक्यता होती. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून व्हीप जारी केल्यामुळे भाजपची मते दानवे यांनाच मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात खैरे यांचा एकहाती अंमल होता. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांना राज्य पातळीवर चमकण्यासाठी फारशी संधी मिळाली नाही. मात्र खैरे यांच्याविषयी असलेली नाराजी आणि त्यांचा झालेला पराभव यामुळे शिवसेना नेतृत्वाने औरंगाबादमधून नव्या चेहऱ्याला संधी दिली. केवळ संधी न देता दानवे यांच्या विजयासाठी युतीची ताकद उभी केली. तर शिवसेनेचा कायम विरोध करणाऱ्या एमआयएमने देखील दानवे यांना मदत केली. यावरून दानवे यांचे सर्वच पक्षांसोबत असलेले संबंध मैत्रीपूर्ण असल्याचे स्पष्ट होते.

खैरेंची जागा घेणार

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शब्द औरंगाबादच्या राजकारणात मागील कित्येक वर्षांपासून प्रमाण मानला जायचा. परंतु, त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे अपसुकच अंबादास दानवे यांचे महत्त्व वाढणार आहे. त्यातच मराठा समाजातील असल्यामुळे दानवे यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. एकूणच औरंगाबादममध्ये खैरे यांच्यानंतर दानवेंकडे शिवसेनेचे नेतृत्व म्हणून पाहिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.