शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आंबोली धबधब्याच्या नामकरणाच्या हालचाली, धबधबा अडकला सीमावादात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 7:42 PM

जगाच्या नकाशावर आलेल्या निसर्ग संपदेनं परिपूर्ण असलेल्या आंबोलीचा धबधबा सीमेच्या वादात अडकला आहे. आंबोली आणि पारपोली या दोन्ही ग्रामपंचायतींनी आंबोली धबधब्यावर दावा केला आहे.

सावंतवाडी, दि. 13 - जगाच्या नकाशावर आलेल्या निसर्ग संपदेनं परिपूर्ण असलेल्या आंबोलीचा धबधबा सीमेच्या वादात अडकला आहे. आंबोली आणि पारपोली या दोन्ही ग्रामपंचायतींनी आंबोली धबधब्यावर दावा केला आहे. आंबोली हा धबधबा पारपोली गावाच्या हद्दीत येत असल्यानं त्याच्या नामकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. आंबोलीच्या नामकरणासाठी पारपोलीवासीय आणि वनविभागामध्ये गुप्त बैठकाही सुरू आहेत. आंबोलीचं नामकरण करण्याला आंबोलीवासीयांचा विरोध आहे. आंबोली घाट व वर्षा पर्यटनाला मुख्य आंबोलीच्या धबधब्यामुळे वरदान लाभलं आहे. या धबधब्यावर दिवसाकाठी हजारो पर्यटक येतात; निसर्ग संपदेनं तृप्त असलेला हा धबधबा सीमेच्या वादात फसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीचा विकास व्हावा, यासाठी आंबोली धबधब्याला भेट देणार्‍या पर्यटकांकडून प्रत्येकी 10 रुपये पर्यटन कर आकारण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्यात आली. आतापर्यंत वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून समितीकडे दहा लाखांहून अधिकची रक्कम कराच्या स्वरुपात गोळा झालेली आहे. येत्या काळात या रकमेत वाढ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.कराच्या माध्यमातून मिळणारे लाखो रुपये हाच कळीचा मुद्दा ठरला असून, पारपोली ग्रामपंचायतीला धबधब्याचं नामकरण करायचं आहे. पर्यटनातून मिळणा-या कराच्या उत्पन्नावर आता पारपोली आणि आंबोली या दोन्ही ग्रामपंचायतींचा डोळा आहे. त्यामुळे ते उत्पन्न आपल्यालाच मिळावे, यासाठी दोन्ही ग्रामपंचायती प्रयत्नशील आहेत. वनविभाग आणि महसूल विभागाने कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार आंबोली धबधबा हा पारपोली गावच्या हद्दीत येत असल्यामुळे त्याची देखरेख आणि मिळणारे उत्पन्न आमच्या ग्रामपंचायतीला देण्यात यावे, अशी मागणी पारपोली ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. आंबोली धबधब्याचे नामकरण ‘शिवमुख धबधबा पारपोली’ असे करण्याचाही पारपोली ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. त्यासाठी ग्रामस्थ आणि वनविभागाच्या गोपनीय बैठका होतायत.आचारसंहितेमुळे त्यांना उघड कोणतीही भूमिका घेता येत नाही. नामकरणाला आंबोली आणि चौकुळ ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच इतकी वर्षे हा आंबोली धबधबा या नावानेच ओळखला जात असल्यामुळे काहीही झाले तरी आम्ही त्याचे नाव बदलण्यास देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलीय. मात्र दोन गावांत वाद लावण्यासाठी वन विभागाचे अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोपही आंबोली चौकूळ ग्रामस्थांनी केला आहे. विद्यमान उपसरपंच धबधब्याच्या ठिकाणी करवसुली करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकात बसतात ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे असा प्रकार करू शकत नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.