शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

आव्हाडांच्या विधानानं ठाकरे गटाची कोंडी?; अंबादास दानवेंनी भाजपालाच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 11:56 IST

प्रभू श्रीराम हे या देशाचे आदर्श आहेत. त्यांच्याविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलले पाहिजे असं त्यांनी म्हटलं. 

छत्रपती संभाजीनगर - राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या विधानानं राज्यात वाद निर्माण झाला आहे. राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता असं आव्हाडांनी म्हटलं. आव्हाडांच्या या विधानावरून भाजपा-शिवसेना-अजित पवार गट आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी आव्हाडांच्या विधानाविरोधात आंदोलन केले जात आहे. अशातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटाने या विधानाशी फारकत घेत आम्ही याचे समर्थन करत नाही. परंतु त्याचसोबत ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाला सुनावले आहे. 

 जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं ठाकरे गटाची कोंडी झालीय का असा प्रश्न पत्रकारांनी दानवेंना विचारला. त्यावर ते म्हणाले की, आमची कोंडी होत नाही. ते जितेंद्र आव्हाडांचे विधान आहे ते त्यांच्यापाशी असेल. आम्ही या विधानाचे समर्थन करत नाही. रस्त्यावर उतरण्याची काही गरज आहे असं वाटत नाही. पण या विधानाचा निषेध करतो. प्रभू श्रीराम हे या देशाचे आदर्श आहेत. त्यांच्याविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलले पाहिजे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच हिंदुत्वाच्या गोष्टी भाजपानं करू नये. गोमांसाचे समर्थन करणारे भाजपाचे लोक आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री काय बोलले हे माहिती आहे. हे हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही. या फालतू गोष्टी आम्हाला सांगू नका. मांसाहार खाऊन तुम्ही आंदोलन करतातच ना..आमची कसलीही अडचण नाही. घाबरण्याची गरज काय?. चर्तुर्थीच्या दिवशी मटण खाणारे आम्हाला काय शिकवणार असा टोला अंबादास दानवे यांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे. 

रोहित पवारांनी दिला घरचा आहेर

आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाचा टोला लगावल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAmbadas Danweyअंबादास दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा