शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

शेतमालाच्या खुल्या खरेदीला मुभा, बाजार समित्यांचे नियंत्रण संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 07:24 IST

पणन संचालकांचा आदेश जारी; सहकार क्षेत्रात उडाली खळबळ

- राजेश निस्तानेयवतमाळ : कोणताही शेतमाल खरेदी करायचा असेल तर आतापर्यंत तो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच केला जात होता. परंतु शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकार गोठवून व्यापाऱ्यांवरील नियंत्रण संपुष्टात आणले आहे.शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रचलन व सुविधा) अध्यादेश २०२० ची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. पणन संचालक सतीश सोनी यांनी १० ऑगस्टला या संबंधीचे आदेश जारी केले.राज्यात ३०७ कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि ६१५ उपबाजार आहेत. बाजार समितीतच खरेदी बंधनकारक असल्याने व्यापारी, अडते, हमाल यांना परवाना जारी केला जात होता. शेतकरी व व्यापारी यांच्या व्यवहारात बाजार समिती मध्यस्थाची भूमिका वठवित होती. शेतकºयांची फसवणूक होऊ नये म्हणून बाजार समितीच्या काट्यावर शेतमाल मोजला जात होता. त्याची समितीला एक टक्का बाजार फी (सेस) मिळते. याशिवाय पाच पैसे प्रति शेकडा पर्यवेक्षण शुल्क वसूल केले जाते.हमी भाव मिळण्याची शाश्वती नाहीत्यावर बाजार समितीचे नियंत्रण राहणार नसल्याने शेतकºयांना हमी भाव मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे शेतकºयांची कमी दरात शेतमाल खरेदी करून व्यापाºयांकडून फसवणूक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.‘सेस’वर बाजार समित्यांचे अर्थकारण चालते. परंतु १० आॅगस्टच्या आदेशान्वये व्यापारी आता कुठेही शेतमालाची खरेदी करू शकतो. यातून खेडा खरेदी खुली होणार आहे.शेतमालाचा भाव ठरविणार कोण?ज्याच्याकडे पॅनकार्ड असेल तो कुणीही व्यक्ती शेतमालाची खरेदी करू शकतो. त्याला कोणत्याही परवान्याची गरज राहणार नाही. शेतकºयांचे संघटन नाही, त्याच्या मालाचा भाव तो ठरविणार कसा, त्याला माल ठेवण्यासाठी गोदाम नाही, त्यामुळे पडलेल्या भावात माल विकण्याची वेळ त्याच्यावर येण्याची शक्यता आहे.उत्पन्नाचा एकच मार्ग, तोही खुंटलाबाजार फी हा बाजार समित्यांचा एकमेव उत्पन्नाचा मार्ग आहे. मात्र तोच बंद झाल्याने आता बाजार समित्यांवर अवकळा येणार आहे. तेथील यंत्रणेचे काय हा सुद्धा प्रश्न आहे.केवळ शासकीय खरेदी होईलबाजार समित्यांच्या यार्डात आता केवळ सीसीआय, पणन महासंघ व नाफेडमार्फत होणारी कापूस, तूर, चना, सोयाबीन आदींची शासकीय खरेदी तेवढी होण्याची चिन्हे आहेत. यातूनच व्यापारी बाहेर कापूस व अन्य शेतमाल स्वस्तात खरेदी करून हाच शेतमाल बाजार समित्यांमध्ये शासकीय योजनेत शेतकºयांच्या नावावर खपवून नफा कमविण्याची शक्यताही नाकारता येत नाही.महाराष्ट्र शासनाने केंद्राचा नवा कायदा जसाच्या तसा लागू करू नये. त्याच्या अंमलबजावणीची घाई करू नये. त्याबाबत फेरविचार करावा. शेतकरी व प्रक्रियेतील सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा. बाजार समित्या शेतकरी हिताचे काम करतात. नव्या कायद्यामुळे एपीएमसी व्यवस्था पूर्णत: कोलमडून पडणार असून शेतकºयांचीही लूट होणार आहे. त्याला कुणी वाली राहणार नाही.- प्रवीण देशमुख, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :Farmerशेतकरी