शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

पालिका निवडणुकांतही भाजपविरोधात आघाडी- बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 09:43 IST

ईडीचा केंद्राकडून गैरवापर सुरूच

ठाणे  : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. त्याकरिता महाविकास आघाडीतील सर्वपक्षांना त्यांनी सबुरीचा सल्ला दिला.काँग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. थोरात म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही इंधन दरवाढ होत आहे. दुर्दैवाने केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही, कॉंग्रेसच्या काळात एक रुपयाची जरी इंधन दरवाढ झाली तरी भाजपकडून आंदोलन केले जात होते. आता भाजपचे कार्यकर्ते लपून बसले आहेत का? त्यांचा शोध घेण्याची वेळ आल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ईडीसारख्या यंत्रणांचा केंद्राकडून गैरवापर सुरू असल्याचे आता लहान मुलांनासुद्धा समजायला लागले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे चौकशी होत नसल्याने शांत झोप लागते, असे विधान केले होते. त्याचा समाचार घेताना थोरात म्हणाले की, पाटील यांचे हे विधान भाजपमधील नेत्यांवर कारवाई होत नसल्याचा स्पष्ट पुरावा आहे. राज्यातील सरकार कमकुवत करण्याचे, पाडण्याचे कितीही प्रयत्न केले तरी भक्कम आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासलेराधाकृष्ण विखे-पाटील यांनी आणखी एका नेत्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे जे वक्तव्य केले त्यामुळे त्यांची कीव येते. विखे हे शपथविधीचे स्वप्न पाहत होते, नवीन कपडेही त्यांनी शिवले होते, आज ना उद्या सरकार पडेल, असे त्यांना वाटत होते, परंतु मनाजोगे काही होत नसल्याने विखेंना नैराश्य आले आहे. त्यामुळे ते बेताल वक्तव्ये करीत असल्याची टीका थोरात यांनी केली.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसBJPभाजपा