शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत, जिल्हा प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 07:55 IST

Uddhav Thackeray : कुठेही सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोहासाठी गर्दी होणार नाही, याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले.

ठळक मुद्दे‘ब्रेक दि चेन’मध्ये निर्बंधांबाबत निकष, पातळ्या निश्चित करणाऱ्या ४ जूनच्या आदेशानंतर निर्बंध शिथील झाल्याचा समज निर्माण झाला होता.निर्बंध लावायचे किंवा नाही, याकरिता पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत.

मुंबई : कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ‘ब्रेक दि चेन’मध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोहासाठी गर्दी होणार नाही, याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले.

‘ब्रेक दि चेन’मध्ये निर्बंधांबाबत निकष, पातळ्या निश्चित करणाऱ्या ४ जूनच्या आदेशानंतर निर्बंध शिथील झाल्याचा समज निर्माण झाला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन कुठेही सरसकट निर्बंध शिथील केले नसून, आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा, असे स्पष्ट केले. ते म्हणाले की, रुग्णसंख्या कमी करण्यात यश येत असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. निर्बंध लावायचे किंवा नाही, याकरिता पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असतात. लेव्हल्स ठरविल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल, याविषयी मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला, दबावाला बळी पडू नका, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनानाला आहे. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन अधिक काळजी घ्या, सावध रहा, रात्रच नव्हे तर दिवसदेखील वैऱ्याचा आहे.कोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नाही. त्यामुळे एकीकडे विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरू कसे होतील, हे पाहणे एवढ्याचसाठी निर्बंधांच्या या पातळ्या ठरविल्या आहेत. आपण स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गर्दी, नियम तोडलेले चालणार नाही!- नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडला आमंत्रण देणारी गर्दी, समारंभ, सोहळे चालणार नाहीत.  - आरोग्यविषयक नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. दैनंदिन व्यवहार किती उघडायचे, किती काळ सुरु ठेवायचे, त्याच्या वेळा, या सर्व बाबी त्या-त्या भागातील प्रशासनाने ठरवायच्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोरोनामुक्त गावांची टक्केवारी गृहीत धरणारग्रामीण भागातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपण कोरोनामुक्त गाव करा, म्हणून आवाहन केले आहे. या कोरोनामुक्त गावांची टक्केवारीदेखील आपल्याला या नव्या पातळ्यांमध्ये गृहीत धरावी लागेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या