शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

"मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक, पण..."; बैठकीत पास करण्यात आला असा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 23:13 IST

शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकार अतिशय गांभीर्याने प्रयत्न करत असून काही तरी थातुरमातुर न करता न्यायालयात टिकणारे आरक्षण कसे देता येईल हे पाहिले जाईल. हे करतांना इतर समाजावरही अन्याय होऊ देणार नाही, त्यामुळे इतर समाजाने सुद्धा आंदोलनाचा मार्ग अवलंबू नये अशी विनंतीही या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत आणि त्या दृष्टीने ठोस पावले टाकण्यात येत आहेत. यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती आज सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते पत्रकांसोबत बोलत होते. सह्याद्री अतिथिगृह येथे आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठा समाजास आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय झाला. यावेळी या आंदोलनादरम्यान नागरिकांवर झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरु झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आणि विशेषतः मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून आंदोलन सुरु आहे. यासंदर्भात आज सर्व पक्षांच्या सदस्यांनी आमच्या निमंत्रणास मान दिला,  ते उपस्थित राहिले  त्याबद्दल सर्वपक्षीय नेत्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. या सर्वांनी उपस्थित केलेल्या सूचना आणि मुद्द्यांची अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे सुरु असलेले उपोषण आणि त्यांच्या आरोग्याची असलेली चिंता यामुळे ही सर्वपक्षीय बैठक तातडीने घेण्यात आली. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, जेव्हा अशा प्रकारचे प्रसंग निर्माण झाले त्या-त्या वेळचे राज्यकर्ते, विरोधी पक्ष आणि नेते यांच्या बैठका झाल्या. त्यातून निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे, हीच भावना ठेवून आज इथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली, असेही शिंदे यांनी सांगितले.

आजच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी चर्चा करुन ठराव पारित केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीच्या संदर्भात हा महत्त्वाचा ठराव पारित करण्यात आला आहे. सरकार मागणीवर कार्यवाही करत असून थोडा वेळ दिला पाहिजे. तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेण्याची विनंती करणारा हा ठराव एकमताने पारित करण्यात आला. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकार अतिशय गांभीर्याने प्रयत्न करत असून काही तरी थातुरमातूर न करता न्यायालयात टिकणारे आरक्षण कसे देता येईल हे पाहिले जाईल. हे करतांना इतर समाजावरही अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे इतर समाजानेसुद्धा आंदोलनाचा मार्ग अवलंबू नये, अशी विनंतीही या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केली. बैठकीत उपस्थित नेत्यांनी देखील यावेळी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना सहमती दर्शविली व आपल्या सुचना मांडल्या.

उपोषणाच्या वेळी परिस्थिती योग्य पध्दतीने न हाताळल्याबद्दल संबधित उपविभागीय अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

न्यायमूर्ती शिंदे समितीमध्ये मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येईल असेही यावेळी ठरले. सर्व पक्षाच्या नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना पाठींबा दिला, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवावे लागतील, असे सांगून राज्य शासनाने यासाठी पावले टाकली आहेत, असे सांगितले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेreservationआरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस