शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्यातील सर्व आमदार अद्याप 'बिनपगारी फुल्ल अधिकारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 12:08 IST

विधान मंडळ कार्यालयाने या संदर्भात माहिती दिली आहे. विधानसभा सदस्यांना आमदारकीची शपथ घेतल्यापासून पगार आणि भत्ते देणे अनुज्ञेय आहे. मात्र आमदारांना अद्याप कोणताही भत्ता किंवा पगार देण्यात आला नसल्याचे विधान मंडळ कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता दोन महिने होतील. मंत्रीपदं निश्चित झाली असली तरी मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. विधानसभा निकालानंतर निर्माण झालेली अभूतपूर्व स्थिती, त्यानंतर लागू झालेली राष्ट्रपती राजवट, 80 तासांच भाजपच सरकार आणि त्यानंतर महाविकास आघाडीची सरशी यामुळे मराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. याचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फटका बसलाच. तर खुद्द आमदार मंडळी यातून वाचू शकली नाही. आमदार झाल्यापासून आमदार बिनपगारी असल्याचे समोर आले आहे. 

विधानसभेतील सर्वच्या सर्व 288 आमदार सध्या तरी बिनपगारी आणि फुल्ल अधिकारी असल्याची स्थिती आहे. अर्थात पूर्णवेळ कारभारी आहेत. धर्माबाद येथील आरटीआय कार्यकर्ते डॉ. एस.एस. जाधव यांनी मागवलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले.  त्यांनी माहितीच्या अधिकारात 288 आमदारांना ऑक्टोबर महिन्यात देण्यात आलेले भत्ते आणि पगार या संदर्भात माहिती मागवली होती. 

विधान मंडळ कार्यालयाने या संदर्भात माहिती दिली आहे. विधानसभा सदस्यांना आमदारकीची शपथ घेतल्यापासून पगार आणि भत्ते देणे अनुज्ञेय आहे. मात्र आमदारांना अद्याप कोणताही भत्ता किंवा पगार देण्यात आला नसल्याचे विधान मंडळ कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे वेतन आणि भत्त्यापासून  आमदार वंचित आहेत. निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागला होता. मात्र शिवसेना आणि भाजपची मैत्री तुटल्याने एक महिना सरकार स्थापन होऊ शकले नव्हते. त्यामुळे आमदारांचा शपथविधी होऊ शकला नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आमदारांचा शपथविधी झाला आहे. मात्र त्यांना अद्याप वेतन आणि भत्ते मिळाले नसून आमदार स्वखर्चातून कामं करत आहेत.