शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
2
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
3
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
4
"माझ्या नशिबात जे लिहिलं आहे, ते…" टी-20 संघातून डच्चू दिल्याबद्दल गिल पहिल्यांदाच मनातलं बोलला!
5
"काम करा, मग तोंड दाखवा..." शिंदेसेनेचे उमेदवार प्रचाराला आले अन् महिलांचा संताप अनावर झाला
6
'मर्चा' पोह्याची बातच न्यारी; GI टॅग मिळताच सर्वत्र चर्चा, चवीने लावलं वेड, खवय्यांचं जिंकलं मन
7
WPL 2026 Anushka Sharma Debut :विराट कोहलीला आयडॉल मानणाऱ्या अनुष्का शर्माची फिफ्टी हुकली, पण...
8
WPL 2026 मधील मिस्ट्री अँकर, तिच्या सौंदर्यावर फॅन्स झाले फिदा, कोण आहे ती?
9
इन्स्टाग्रामवर ओळख, बसस्थानकावर बोलावले, कारमध्ये बसवून...; अहिल्यानगरच्या तरुणीवर पुणे जिल्ह्यात नको ते घडलं
10
२.८५ लाख रुपये पगार, ७५ लाखांचं कर्ज आणि २ कोटी रुपयांचं नुकसान; F&O ट्रेडिंगची 'त्याची' भयानक कहाणी
11
‘सत्तेत राहून एकमेकावर आरोप कसले करतात? हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा’, काँग्रेसचं भाजपा आणि अजित पवारांना आव्हान   
12
भारत, चीन, ब्राझील आणि सौदी अरेबिया अमेरिकेतून काढताहेत पैसे, जाणून घ्या कारण
13
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या औषधात विष; 'या' सिरपच्या विक्रीवर बंदी, सापडले घातक केमिकल
14
NSA अजित डोवाल मोबाईल अन् इंटरनेट वापरत नाहीत; स्वत:च केला खुलासा, कारणही सांगितले...
15
बदलापुरात महामोर्चाची घोषणा! भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यावरून मनसेचा संताप
16
Rohini Acharya : "वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट
17
'तुषार आपटेचं भर चौकात मुंडके छाटा', स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करताच कालीचरण महाराज कडाडले
18
'भविष्यात शिंदेंची जागा तुरुंगात असेल, त्यांनीच स्वतःच्या गळ्याभोवती फास बांधलाय', गणेश नाईकांचे खळबळजनक गौप्यस्फोट
19
नितीश कुमार यांनी ज्येष्ठ नेत्याला दिला पक्षातून नारळ, जेडीयू म्हणाली, आता आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही
20
"३ वर्ष काम बंद, नवीन घराचा हफ्ता द्यायला पैसे नव्हते, त्यावेळी..."; अमृता खानविलकरने सांगितला स्वामी समर्थांचा विलक्षण अनुभव
Daily Top 2Weekly Top 5

Palghar Mob Lynching: ‘मॉब लिंचिंग’ प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांची भूमिका संशयास्पद; सीबीआय चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 09:04 IST

अखिल भारतीय संत समिती जूना आखाडासोबत आहे. या प्रकरणी देशभरात आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला आहे

ठळक मुद्देअखिल भारतीय संत समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलं पत्रराज्य सरकारवर विश्वास नाही, सीबीआय चौकशी करावीदोषींवर कठोर शासन झालं नाही तर आंदोलन करण्याचा पवित्रा

पालघर – राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे पालघरमधील मॉब लिंचिंग प्रकरणामुळे राजकीय वातावरण पेटलं आहे. पालघर येथे एका अफवेमुळे २ साधूंची जमावाने हत्या केली आहे. या प्रकरणावरुन राज्य सरकारविरोधात साधू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अखिल भारतीय संत समितीने याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

संत समितीने जूना अखाड्याच्या साधूंची हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या हत्येमागे मोठं षडयंत्र असू शकतं असा दावाही त्यांनी केला आहे. अखिल भारतीय संत समितीकडून हे पत्र महामंत्री स्वामी जितेंद्र नंद सरस्वती यांनी लिहिलं आहे. या प्रकरणाला नक्षली संबंधाशी जोडताना त्यांनी पत्रात लिहिलंय की, पालघरमध्ये दोन साधू आणि चालक यांच्या हत्येने महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापूर्वीच अखिल भारतीय अखाडा परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर दोषींवर कठोर शासन नाही झालं तर महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.

तसेच अखिल भारतीय संत समिती जूना आखाडासोबत आहे. या प्रकरणी देशभरात आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यासाठी राज्य सरकारवर विश्वास ठेऊ शकत नाही. या घटनेवरील त्यांचे ट्विट एका बाजूचे वाटत असल्याने या प्रकरणाशी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पालघरमध्ये झालेल्या हत्यांकांडानंतर राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. या प्रकारानंतर २ पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे तर १०० हून जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेविरोधात सोशल मीडियात आक्रोश पाहायला मिळत आहे. मात्र या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नका, गैरसमजुतीतून ही हत्या झाली आहे. सामाजिक तेढ निर्माण करु नये असं राज्य सरकारकडून बजावण्यात आलं आहे. त्यामुळे पालघर घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याचं सध्या दिसून येत आहे.

टॅग्स :palgharपालघरAnil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागCentral Governmentकेंद्र सरकार