शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Palghar Mob Lynching: ‘मॉब लिंचिंग’ प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांची भूमिका संशयास्पद; सीबीआय चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 09:04 IST

अखिल भारतीय संत समिती जूना आखाडासोबत आहे. या प्रकरणी देशभरात आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला आहे

ठळक मुद्देअखिल भारतीय संत समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलं पत्रराज्य सरकारवर विश्वास नाही, सीबीआय चौकशी करावीदोषींवर कठोर शासन झालं नाही तर आंदोलन करण्याचा पवित्रा

पालघर – राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे पालघरमधील मॉब लिंचिंग प्रकरणामुळे राजकीय वातावरण पेटलं आहे. पालघर येथे एका अफवेमुळे २ साधूंची जमावाने हत्या केली आहे. या प्रकरणावरुन राज्य सरकारविरोधात साधू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अखिल भारतीय संत समितीने याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

संत समितीने जूना अखाड्याच्या साधूंची हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या हत्येमागे मोठं षडयंत्र असू शकतं असा दावाही त्यांनी केला आहे. अखिल भारतीय संत समितीकडून हे पत्र महामंत्री स्वामी जितेंद्र नंद सरस्वती यांनी लिहिलं आहे. या प्रकरणाला नक्षली संबंधाशी जोडताना त्यांनी पत्रात लिहिलंय की, पालघरमध्ये दोन साधू आणि चालक यांच्या हत्येने महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापूर्वीच अखिल भारतीय अखाडा परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर दोषींवर कठोर शासन नाही झालं तर महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.

तसेच अखिल भारतीय संत समिती जूना आखाडासोबत आहे. या प्रकरणी देशभरात आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यासाठी राज्य सरकारवर विश्वास ठेऊ शकत नाही. या घटनेवरील त्यांचे ट्विट एका बाजूचे वाटत असल्याने या प्रकरणाशी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पालघरमध्ये झालेल्या हत्यांकांडानंतर राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. या प्रकारानंतर २ पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे तर १०० हून जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेविरोधात सोशल मीडियात आक्रोश पाहायला मिळत आहे. मात्र या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नका, गैरसमजुतीतून ही हत्या झाली आहे. सामाजिक तेढ निर्माण करु नये असं राज्य सरकारकडून बजावण्यात आलं आहे. त्यामुळे पालघर घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याचं सध्या दिसून येत आहे.

टॅग्स :palgharपालघरAnil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागCentral Governmentकेंद्र सरकार