शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

Palghar Mob Lynching: ‘मॉब लिंचिंग’ प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांची भूमिका संशयास्पद; सीबीआय चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 09:04 IST

अखिल भारतीय संत समिती जूना आखाडासोबत आहे. या प्रकरणी देशभरात आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला आहे

ठळक मुद्देअखिल भारतीय संत समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलं पत्रराज्य सरकारवर विश्वास नाही, सीबीआय चौकशी करावीदोषींवर कठोर शासन झालं नाही तर आंदोलन करण्याचा पवित्रा

पालघर – राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे पालघरमधील मॉब लिंचिंग प्रकरणामुळे राजकीय वातावरण पेटलं आहे. पालघर येथे एका अफवेमुळे २ साधूंची जमावाने हत्या केली आहे. या प्रकरणावरुन राज्य सरकारविरोधात साधू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अखिल भारतीय संत समितीने याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

संत समितीने जूना अखाड्याच्या साधूंची हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करुन दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या हत्येमागे मोठं षडयंत्र असू शकतं असा दावाही त्यांनी केला आहे. अखिल भारतीय संत समितीकडून हे पत्र महामंत्री स्वामी जितेंद्र नंद सरस्वती यांनी लिहिलं आहे. या प्रकरणाला नक्षली संबंधाशी जोडताना त्यांनी पत्रात लिहिलंय की, पालघरमध्ये दोन साधू आणि चालक यांच्या हत्येने महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापूर्वीच अखिल भारतीय अखाडा परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर दोषींवर कठोर शासन नाही झालं तर महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे.

तसेच अखिल भारतीय संत समिती जूना आखाडासोबत आहे. या प्रकरणी देशभरात आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यासाठी राज्य सरकारवर विश्वास ठेऊ शकत नाही. या घटनेवरील त्यांचे ट्विट एका बाजूचे वाटत असल्याने या प्रकरणाशी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पालघरमध्ये झालेल्या हत्यांकांडानंतर राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. या प्रकारानंतर २ पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे तर १०० हून जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेविरोधात सोशल मीडियात आक्रोश पाहायला मिळत आहे. मात्र या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नका, गैरसमजुतीतून ही हत्या झाली आहे. सामाजिक तेढ निर्माण करु नये असं राज्य सरकारकडून बजावण्यात आलं आहे. त्यामुळे पालघर घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याचं सध्या दिसून येत आहे.

टॅग्स :palgharपालघरAnil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागCentral Governmentकेंद्र सरकार