शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

यशस्वी दूध आंदोलन नेटाने पुढे नेऊया, अखिल भारतीय किसान सभेचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 13:38 IST

दुधाला सरकारने प्रतिलिटर 27 रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी किसान सभेच्यावतीने दूध वाटप आंदोलन करण्यात आले

मुंबई - दुधाला सरकारने प्रतिलिटर 27 रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी किसान सभेच्यावतीने दूध वाटप आंदोलन करण्यात आले. ‘लुटता कशाला, फुकटच प्या’, अशी घोषणाबाजी यावेळी आंदोलकांनी दिल्या. अशा पद्धतीनं राज्यभर दूध आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवार दोन महत्त्वपूर्ण घटनांमुळे गाजला. पहिली घटना, राज्यात जोमदारपणे सुरू झालेले दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अभिनव मोफत दूध वाटपाचे आंदोलन करण्यात आले, दुसरी घटना म्हणजे पालघर जिल्ह्यात डहाणू येथे किसान सभा व माकपाच्या नेतृत्वाखाली, शेतकऱ्यांच्या जमिनींवर संक्रांत आणू पाहणारे भाजपा सरकारचे बुलेट ट्रेन आणि सुपर हायवे प्रकल्प हाणून पाडण्यासाठी आणि किसान सभेच्या लाँग मार्चच्या वनाधिकार, कर्जमाफी व इतर मागण्यांच्या अमलासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यांतील 35 हजार शेतकऱ्यांचा अभूतपूर्व निर्धार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने राज्यातील दूध आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिला. 

राज्य सरकारनेच जाहीर केलेल्या २७ रुपयांच्या हमी भावासाठी ३ मे पासून महाराष्ट्राच्या ९ जिल्ह्यांत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जोरदार मोफत दूध वाटप आंदोलन सुरू झाले. किसान सभेच्या नेतृत्वाचा व कार्यकर्त्यांचा या आंदोलनात महत्त्वाचा वाटा आहे.

आज फक्त १७ रुपयांचा भाव शेतकऱ्यांना दिला जात आहे आणि सरकार तरीही मूग गिळून गप्प बसले आहे. या आंदोलनाने राज्य सरकारला बचावात्मक भूमिका घेण्यास भाग पाडले आहे. पण दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील काही दिवस हे आंदोलन दररोज पेटत राहणे आणि पसरत जाणे अत्यंत निकडीचे आहे.

अखिल भारतीय किसान सभा हे दूध आंदोलन पेटविणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे आणि किसान सभेच्या तसेच इतर सहभागी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करीत आहे आणि विजय मिळेपर्यंत हे आंदोलन राज्यभर जास्त तीव्र करण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान सभेकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलनmilkदूध