शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यशस्वी दूध आंदोलन नेटाने पुढे नेऊया, अखिल भारतीय किसान सभेचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 13:38 IST

दुधाला सरकारने प्रतिलिटर 27 रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी किसान सभेच्यावतीने दूध वाटप आंदोलन करण्यात आले

मुंबई - दुधाला सरकारने प्रतिलिटर 27 रूपये दर द्यावा, या प्रमुख मागणीसाठी गुरूवारी किसान सभेच्यावतीने दूध वाटप आंदोलन करण्यात आले. ‘लुटता कशाला, फुकटच प्या’, अशी घोषणाबाजी यावेळी आंदोलकांनी दिल्या. अशा पद्धतीनं राज्यभर दूध आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवार दोन महत्त्वपूर्ण घटनांमुळे गाजला. पहिली घटना, राज्यात जोमदारपणे सुरू झालेले दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अभिनव मोफत दूध वाटपाचे आंदोलन करण्यात आले, दुसरी घटना म्हणजे पालघर जिल्ह्यात डहाणू येथे किसान सभा व माकपाच्या नेतृत्वाखाली, शेतकऱ्यांच्या जमिनींवर संक्रांत आणू पाहणारे भाजपा सरकारचे बुलेट ट्रेन आणि सुपर हायवे प्रकल्प हाणून पाडण्यासाठी आणि किसान सभेच्या लाँग मार्चच्या वनाधिकार, कर्जमाफी व इतर मागण्यांच्या अमलासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यांतील 35 हजार शेतकऱ्यांचा अभूतपूर्व निर्धार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने राज्यातील दूध आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिला. 

राज्य सरकारनेच जाहीर केलेल्या २७ रुपयांच्या हमी भावासाठी ३ मे पासून महाराष्ट्राच्या ९ जिल्ह्यांत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जोरदार मोफत दूध वाटप आंदोलन सुरू झाले. किसान सभेच्या नेतृत्वाचा व कार्यकर्त्यांचा या आंदोलनात महत्त्वाचा वाटा आहे.

आज फक्त १७ रुपयांचा भाव शेतकऱ्यांना दिला जात आहे आणि सरकार तरीही मूग गिळून गप्प बसले आहे. या आंदोलनाने राज्य सरकारला बचावात्मक भूमिका घेण्यास भाग पाडले आहे. पण दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील काही दिवस हे आंदोलन दररोज पेटत राहणे आणि पसरत जाणे अत्यंत निकडीचे आहे.

अखिल भारतीय किसान सभा हे दूध आंदोलन पेटविणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे आणि किसान सभेच्या तसेच इतर सहभागी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करीत आहे आणि विजय मिळेपर्यंत हे आंदोलन राज्यभर जास्त तीव्र करण्याचे आवाहन अखिल भारतीय किसान सभेकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलनmilkदूध