शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अजित पवारांच्या इशाऱ्याने गयारामांची धाकधूक वाढणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 11:48 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमधून आतापर्यंत ३० हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आपल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना पुढे करावे लागत आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

मुंबई - सत्ताधारी पक्षात प्रवेश करून आपल्यावर असलेले गुन्हे आणि विविधी चौकशा थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात नेते भाजप-शिवसेनेत दाखल होत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या सूचक इशाऱ्यामुळे गयारामांची धाकधूक वाढणार आहे.

भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. परंतु, ज्यावेळी भाजपकडून उमेदवारी जाहीर होईल, त्यावेळी हे नेते सैरभैर होणार, असा सूचक इशारा अजित पवार यांनी दिला. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा धडाका लावला आहे. मात्र विधानसभेला केवळ २८८ जागाच लढवता येणार आहे. शिवसेना-भाजप युती होणार हे भाजपकडून सांगितले जात आहे. भाजपचे सध्या १२२ आमदार आहेत. त्यात अपक्षांचा पाठिंबा त्यांनाच आहे. अशा स्थितीत गयारामांना सामावून घेताना भाजपला कसरत करावी लागणार आहे. या स्थितीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गयाराम सैरभैर होणार, असा दावा पवारांनी केला.

दरम्यान भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर गयारामांची स्थिती अवघड होणार आहे. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल, असंही त्यांनी सांगितले. पुण्यातील मर्चंट बँकेच्या शाखेचे नवीन कार्यालयात स्थलांतर झाले. या कार्यक्रमानंतर अजित पवार माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून आतापर्यंत ३० हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आपल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना पुढे करावे लागत आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.