शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

माझ्या जीवात जीव असेपर्यंत...; अजित पवार यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:27 IST

मी कुणाचाही अपमान केला नाही. अनेकदा मी माघार घेतली. अनेकदा कमीपणा घेतला असं अजित पवार म्हणाले.

मुंबई – कार्यकर्त्यांनी मला खूप प्रेम दिले. माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुम्हाला अंतर देणार नाही. मी इथून पुढच्या काळात राज्यभरात फिरेन, माझी भूमिका सांगण्याचा प्रयत्न करेन. २०२४, २०२९ ची निवडणूक असेल नवीन कार्यकर्ते पुढे आणायचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत टीम आपल्याला पुढे आणायची आहे. नुसते भाषणात सांगून नाही तर कृतीत काम करायचा आहे. अजित पवार कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या. त्या आशीर्वादाला मी निश्चित जागेन अशी साद अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  ४-५ वेळा उपमुख्यमंत्री झालो रेकॉर्ड झाला पण पुढेच जात नाही. मी प्रमुख व्हावे मनापासून वाटते. माझ्या मनात काही गोष्ट आहे त्या गोष्टी राबवावं. पक्ष, चिन्ह आपल्याकडेच ठेवायचा आहे. २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आणू. महाराष्ट्र पिंजून काढू. पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरू. आमच्या दैवताने आम्हाला आशीर्वाद द्यावा. मलाही भाषण करता येते. उद्या त्यांनी दौरा सुरू केला तर मलाही उत्तर द्यावे लागेल. माझ्यात खोट नाही. तू निवडून कसा येतो अशी भाषा वरिष्ठांनी करायची. तुमची मुले ना ती, तुम्ही दैवत आमचे. पण असं बोलता. आम्ही जे करतोय ते राज्याच्या भल्यासाठी करतोय. कोट्यवधीचा निधी मतदारसंघाला आणता येईल असं त्यांनी सांगितले.

तसेच मी कुणाचाही अपमान केला नाही. अनेकदा मी माघार घेतली. अनेकदा कमीपणा घेतला. आमच्यावर गुगली टाकली ती सहन केली. सांगितले एक आणि केले दुसरे. मी रोखठोक बोलणारा कार्यकर्ता आहे. आपणच आपल्या कार्यकर्त्यांना घरच्या माणसांना कशापद्धतीने खेळवायचे. बदनाम करायचे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लोकांनी मला व्हिलन केले. मला जे सांगितले ते केले. परकीय मुद्दा निघाला ६ महिन्यात बासनात गुंडाळून ठेवले. त्यानंतर त्यांच्यासोबतच आपण आलो असंही अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, आपल्याला मंत्रिमंडळात आणखी संधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ९ मंत्रिपदे दिली त्यात ओबीसी, अल्पसंख्याक, महिला सगळ्यांना संधी दिली. आजही माझ्या जीवाभावाचे सहकारी आहेत. महामंडळे आहेत. राज्यमंत्रिपदे मिळणार आहेत. मी रात्रंदिवस काम करेन. भाजपा-शिवसेना आमदारही नाराज होतील अशी कामे करणार नाही. आपल्याही आमदारांनाही न्याय देईन. मागील काही वर्ष आमदारांच्या मतदारसंघात ब्लॅकलॉग पडलाय तो भरून देईन हा शब्द देतो असं आश्वासन अजित पवार यांनी दिले.

जितेंद्र आव्हाडांना नाव न घेता टोला

ठाण्याचा पट्टा, त्यांच्यामुळे गणेश नाईक, सुभाष भोईर, किसन कथोरे, संदीप नाईक, निरंजन डावखरे यासारखे अनेकजण पक्ष सोडून गेले. एका मंत्र्यांनी ४ आमदार निवडून आणले पाहिजे. बेरजेचे राजकारण केले पाहिजे. पण आपले आमदार घालवणाऱ्याला नेता बनवला. काही प्रवक्ते चांगल्याचे वाटोळे करतात. तसले काम ती व्यक्ती केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत अजित पवार यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड