शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या जीवात जीव असेपर्यंत...; अजित पवार यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:27 IST

मी कुणाचाही अपमान केला नाही. अनेकदा मी माघार घेतली. अनेकदा कमीपणा घेतला असं अजित पवार म्हणाले.

मुंबई – कार्यकर्त्यांनी मला खूप प्रेम दिले. माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुम्हाला अंतर देणार नाही. मी इथून पुढच्या काळात राज्यभरात फिरेन, माझी भूमिका सांगण्याचा प्रयत्न करेन. २०२४, २०२९ ची निवडणूक असेल नवीन कार्यकर्ते पुढे आणायचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत टीम आपल्याला पुढे आणायची आहे. नुसते भाषणात सांगून नाही तर कृतीत काम करायचा आहे. अजित पवार कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या. त्या आशीर्वादाला मी निश्चित जागेन अशी साद अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  ४-५ वेळा उपमुख्यमंत्री झालो रेकॉर्ड झाला पण पुढेच जात नाही. मी प्रमुख व्हावे मनापासून वाटते. माझ्या मनात काही गोष्ट आहे त्या गोष्टी राबवावं. पक्ष, चिन्ह आपल्याकडेच ठेवायचा आहे. २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आणू. महाराष्ट्र पिंजून काढू. पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरू. आमच्या दैवताने आम्हाला आशीर्वाद द्यावा. मलाही भाषण करता येते. उद्या त्यांनी दौरा सुरू केला तर मलाही उत्तर द्यावे लागेल. माझ्यात खोट नाही. तू निवडून कसा येतो अशी भाषा वरिष्ठांनी करायची. तुमची मुले ना ती, तुम्ही दैवत आमचे. पण असं बोलता. आम्ही जे करतोय ते राज्याच्या भल्यासाठी करतोय. कोट्यवधीचा निधी मतदारसंघाला आणता येईल असं त्यांनी सांगितले.

तसेच मी कुणाचाही अपमान केला नाही. अनेकदा मी माघार घेतली. अनेकदा कमीपणा घेतला. आमच्यावर गुगली टाकली ती सहन केली. सांगितले एक आणि केले दुसरे. मी रोखठोक बोलणारा कार्यकर्ता आहे. आपणच आपल्या कार्यकर्त्यांना घरच्या माणसांना कशापद्धतीने खेळवायचे. बदनाम करायचे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लोकांनी मला व्हिलन केले. मला जे सांगितले ते केले. परकीय मुद्दा निघाला ६ महिन्यात बासनात गुंडाळून ठेवले. त्यानंतर त्यांच्यासोबतच आपण आलो असंही अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, आपल्याला मंत्रिमंडळात आणखी संधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ९ मंत्रिपदे दिली त्यात ओबीसी, अल्पसंख्याक, महिला सगळ्यांना संधी दिली. आजही माझ्या जीवाभावाचे सहकारी आहेत. महामंडळे आहेत. राज्यमंत्रिपदे मिळणार आहेत. मी रात्रंदिवस काम करेन. भाजपा-शिवसेना आमदारही नाराज होतील अशी कामे करणार नाही. आपल्याही आमदारांनाही न्याय देईन. मागील काही वर्ष आमदारांच्या मतदारसंघात ब्लॅकलॉग पडलाय तो भरून देईन हा शब्द देतो असं आश्वासन अजित पवार यांनी दिले.

जितेंद्र आव्हाडांना नाव न घेता टोला

ठाण्याचा पट्टा, त्यांच्यामुळे गणेश नाईक, सुभाष भोईर, किसन कथोरे, संदीप नाईक, निरंजन डावखरे यासारखे अनेकजण पक्ष सोडून गेले. एका मंत्र्यांनी ४ आमदार निवडून आणले पाहिजे. बेरजेचे राजकारण केले पाहिजे. पण आपले आमदार घालवणाऱ्याला नेता बनवला. काही प्रवक्ते चांगल्याचे वाटोळे करतात. तसले काम ती व्यक्ती केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत अजित पवार यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड