शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

छत्रपतींचं नाव घ्यायचं, काही समाजाला धरुन काम करायचं, हे खपवून घेणार नाही - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 19:45 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना घेवून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि हे लोक छत्रपतीचं नाव घेवून काही समाजाला हाताशी धरुन काम करत आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भुदरगड येथील जाहीर सभेत दिला.

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना घेवून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि हे लोक छत्रपतीचं नाव घेवून काही समाजाला हाताशी धरुन काम करत आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भुदरगड येथील जाहीर सभेत दिला.

छत्रपतींच नाव फक्त यांना सत्तेसाठी हवं आहे. मतांसाठी याचं काम सुरु असल्याचा आरोप करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अठरापगड जातींना बरोबर घेवून जाणारा, महिलांना न्याय-सन्मान देणारा आणि शेतकऱ्यांना पुढे नेणारा पक्ष आहे असे स्पष्ट केले. शरद पवार साहेबांनी ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आणि आज कर्जमाफी होवूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेनाशी झाली आहे.का लोकांशी खोटं बोलता असा जाब विचारतानाच सभेतील शेतकऱ्यांना देशाचे कृषीमंत्री कोण आहेत.त्यांचं नाव काय असा प्रश्न केला असता कुणालाच नाव सांगता आले नाही त्यावेळी शेतकऱ्यांशी नाळ जोडलेला कृषीमंत्री हवा असा टोला अजितदादांनी लगावला.

राज्यात मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून ८ लाख कोटीची गुंतवणूक होणार होती. म्हणजे २५ हजार कोटी रुपये प्रत्येक जिल्हयाला चार वर्षात मिळायला हवे होते. आले का? एक रुपया तरी आला का? मग माझ्या तरुणांना रोजगार कसा मिळणार.त्यामुळे लोकांना फसवण्याचे आणि भूलथापा देण्याचे काम थांबवा असा इशाराही अजितदादांनी दिला. साखरेला २१०० ते २२०० दर असेल तर साखर परदेशात कशी जाणार त्यासाठी ३७०० दर दयायला हवा होता. उत्पादक आणि ग्राहकाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब कृषीमंत्री असताना करत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना परवडलेच नाहीतर लाखाचा पोशिंदा कसा जगणार असा सवाल अजित दादांनी केला.

कॅशलेस,कॅशलेस करुन सर्वांनाच कॅशलेस करुन टाकले आहे. कष्टकरी, शेतमजुर,महिला, एस.टी.कर्मचारी,बेरोजगार,सर्वांनाच न्याय मिळत नाहीय.व्यापाऱ्यांचे तर जीएसटीने कंबरडेच मोडून टाकले आहे. माझ्या शेतकऱ्याने ७५ रुपये जरी बुडवले तरी त्यांची भांडीकुंडी बाहेर काढली जातात आणि संभाज५ निलंगेकरांचे ७५ कोटी रुपये बॅंकेचे कर्ज आहे.त्यापैकी २५ कोटी रुपये त्यांनी भरले आणि त्यांचे ५३ कोटी रुपये माफ करण्यात आले हा कुठला न्याय,हा कुठला कायदा,सर्वांना न्याय एकच हवा,वेगळा न्याय खपवून घेणार नाही असा दमही दिला.

आज सर्वात जास्त नुकसान हे पश्चिम महाराष्ट्राचे होत असून आपली सर्वच कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे भविष्यात परिवर्तन करायचं असेल तर फक्त आणि फक्त राष्ट्रवादीच्या घडयाळयाशिवाय पर्याय नाही. बळीराजाला संपन्न करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दया असे आवाहन विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भुदरगडच्या जाहीर सभेत केले.

या सभेत आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार के.पी.पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी खासदार निवेदिता माने, माजी खासदार रणजितसिंह मोहितेपाटील,आमदार रामराव वडकुते,आमदार प्रकाश गजभिये,आमदार जयदेव गायकवाड,आमदार श्रीमती संध्या कुपेकर,माजी आमदार के.पी पाटील,जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील,ओबीसी सेलचे अध्यध ईश्वर बाळबुधे,युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील,विदयार्थी अध्यक्ष अजिंक्य राणापाटील आदींसह भुदरगड,चंदगड,गारगोटी आणि परिसरातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर