शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Ajit Pawar: ...या गोष्टी बंद केल्या पाहिजेत, अजित पवारांनी काँग्रेस नेत्यांना स्पष्टपणे बजावलं   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 14:44 IST

Ajit Pawar: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या काही विधानांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या नेत्यांकडून विविध मुद्द्यांवर परस्परविरोधी मतं व्यक्त होत आहेत. त्यामुळे मविआमध्ये बिघाडी होणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या काही विधानांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

अजित पवार म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेहमी अशा प्रकारची वक्तव्य करतात. आम्हालाही काही मिळते. कारण नसताना महाविकास आघाडीमध्ये अंतर पडू शकतं. त्या गोष्टी मीडियापर्यंत जाण्यापेक्षा त्यांनी जयंत पाटील यांच्याशी बोलावं, माझ्याशी बोलावं, उद्धव ठाकरें शी बोलावं, आदित्य ठाकरेंशी बोलावं. याच्यातून मार्ग निघू शकतो. टाळी एका बाजूने वाजत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या आल्या की महाराष्ट्रातील घटक पक्षांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, तोसुद्धा संभ्रमामध्ये पडतो. त्यामुळे या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. आता ज्यावेळी महाविकास आघाडीची सभा होईल. त्यावेळी मी हे मुद्दे तिथे मांडणार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

मात्र काँग्रेसच्या संदर्भात त्यांचा जो अंतर्गत प्रश्न आहे त्यावर मला बोलायचं नाही. कारण तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या पक्षाचे प्रश्न आपापल्या पातळीवर सोडवावेत. आम्हाला त्याबाबत सूचना करण्याचाही अधिकार नाही आणि नाक खुपसायचा पण अधिकार नाही. मात्र ही आघाडी टिकावी महाविकास आघाडी टिकावी, असं आम्हाला वाटतं, असंही अजित पवार यांनी सांगितलं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNana Patoleनाना पटोलेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी