शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

"घोटाळा शब्दालाही वाटलं असेल आपलाच काहीतरी 'घोटाळा' झालाय", अजित पवारांच्या विधानानं हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 17:25 IST

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेत संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

मुंबई-

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेत संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच अजित पवारांनी आपल्या हटके शैलीत मिश्किलपणे विरोधकांना टोला लगावला. यावेळी अजित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांवर भाष्य केलं. "राज्याचे विरोधी पक्षनेते काल नुसतं घोटाळा, घोटाळा तर होते. अधिवेशन सुरू झाल्यापासून नुसतं घोटाळा, घोटाळा सुरू आहे. आम्ही इथं काय घोटाळेच करायला बसलोय का? यांनी इतक्या वेळा घोटाळा, घोटाळा म्हटलंय की घोटाळा शब्दालाही वाटलं असेल अरे आपलाच काहीतरी घोटाळा झालाय", असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावला. त्यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला. सत्ताधारी आमदारांनी बाक वाजवून अजित पवारांच्या विधानाला दाद दिली. 

मद्यराष्ट्र आणि मद्य विक्री आघाडी अशा विरोधकांकडून केल्या गेलेल्या टीकेला अजित पवार यांनी जशास तसं उत्तर दिलं. यावेळी फडणवीसांनी मध्यप्रदेशातील दारू आणि वाईन विक्री संदर्भातील आकडेवारीच सर्वांसमोर मांडली. उत्पन्न वाढवण्यासाठी काही गोष्टी केल्या पण वाईट गोष्टी घडणार असतील तर निर्णय लागू होणार नाही, असं अजित पवार म्हणाले. "आपला महाराष्ट्र साधुसंतांचा आहे. त्यामुळे राज्याला असं मद्यराष्ट्र आणि दारुला प्रोत्साहन देणारं सरकार म्हणून हिणवू नये. चंद्रपूरमधील दारुबंदी उठवण्यासाठी नेत्यांनीच मागणी केली होती. सुपरमार्केटमध्ये सध्या अंडी, मटण विक्रीस ठेवलेलं असतं तिथं शाकाहारी माणूस जात नाही. जनतेला ते नको असेल तर ते आम्ही लादणार नाही", असं अजित पवार म्हणाले. 

विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांनी 32 वर्ष मुख्यमंत्रिपद भूषवलं : अजित पवार"आम्ही सरकारमध्ये असलो की विदर्भाचे विरोधक आहोत अशी भावना तयार करायचं काम होतं आहे. पण हे काही बरोबर नाही. आम्ही पण सरकारमध्ये काम करतो. कोणीही संपूर्ण राज्याचा मंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून काम करत असतो. फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा ते काही फक्त विदर्भाचे मुख्यमंत्री नव्हते. जयंत पाटील अर्थमंत्री असताना नाथसागरपासून गोदावरी वर बॅरेज बांधण्याचं काम केलं. मराठवाडा ग्रीडला आमचा विरोध असण्याचं कारण नाही. इस्त्राईल सारख्या देशात चार इंच पाऊस पडतो, पाईपलाईन द्वारे लांबवर पाणी नेलं. मागच्या सरकारमध्ये मराठवाडा ग्रीड संदर्भात काम झालं. आम्ही टप्प्या टप्प्यानं पुढं जाणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या नेत्यांनी 32  वर्ष मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही", असं अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र