शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

"घोटाळा शब्दालाही वाटलं असेल आपलाच काहीतरी 'घोटाळा' झालाय", अजित पवारांच्या विधानानं हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 17:25 IST

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेत संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

मुंबई-

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेत संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच अजित पवारांनी आपल्या हटके शैलीत मिश्किलपणे विरोधकांना टोला लगावला. यावेळी अजित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांवर भाष्य केलं. "राज्याचे विरोधी पक्षनेते काल नुसतं घोटाळा, घोटाळा तर होते. अधिवेशन सुरू झाल्यापासून नुसतं घोटाळा, घोटाळा सुरू आहे. आम्ही इथं काय घोटाळेच करायला बसलोय का? यांनी इतक्या वेळा घोटाळा, घोटाळा म्हटलंय की घोटाळा शब्दालाही वाटलं असेल अरे आपलाच काहीतरी घोटाळा झालाय", असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावला. त्यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला. सत्ताधारी आमदारांनी बाक वाजवून अजित पवारांच्या विधानाला दाद दिली. 

मद्यराष्ट्र आणि मद्य विक्री आघाडी अशा विरोधकांकडून केल्या गेलेल्या टीकेला अजित पवार यांनी जशास तसं उत्तर दिलं. यावेळी फडणवीसांनी मध्यप्रदेशातील दारू आणि वाईन विक्री संदर्भातील आकडेवारीच सर्वांसमोर मांडली. उत्पन्न वाढवण्यासाठी काही गोष्टी केल्या पण वाईट गोष्टी घडणार असतील तर निर्णय लागू होणार नाही, असं अजित पवार म्हणाले. "आपला महाराष्ट्र साधुसंतांचा आहे. त्यामुळे राज्याला असं मद्यराष्ट्र आणि दारुला प्रोत्साहन देणारं सरकार म्हणून हिणवू नये. चंद्रपूरमधील दारुबंदी उठवण्यासाठी नेत्यांनीच मागणी केली होती. सुपरमार्केटमध्ये सध्या अंडी, मटण विक्रीस ठेवलेलं असतं तिथं शाकाहारी माणूस जात नाही. जनतेला ते नको असेल तर ते आम्ही लादणार नाही", असं अजित पवार म्हणाले. 

विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांनी 32 वर्ष मुख्यमंत्रिपद भूषवलं : अजित पवार"आम्ही सरकारमध्ये असलो की विदर्भाचे विरोधक आहोत अशी भावना तयार करायचं काम होतं आहे. पण हे काही बरोबर नाही. आम्ही पण सरकारमध्ये काम करतो. कोणीही संपूर्ण राज्याचा मंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून काम करत असतो. फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा ते काही फक्त विदर्भाचे मुख्यमंत्री नव्हते. जयंत पाटील अर्थमंत्री असताना नाथसागरपासून गोदावरी वर बॅरेज बांधण्याचं काम केलं. मराठवाडा ग्रीडला आमचा विरोध असण्याचं कारण नाही. इस्त्राईल सारख्या देशात चार इंच पाऊस पडतो, पाईपलाईन द्वारे लांबवर पाणी नेलं. मागच्या सरकारमध्ये मराठवाडा ग्रीड संदर्भात काम झालं. आम्ही टप्प्या टप्प्यानं पुढं जाणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या नेत्यांनी 32  वर्ष मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही", असं अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र