शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सकाळी ८ वाजता शपथविधी झाला, त्याला पहाट म्हणतात का? अजित पवारांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 12:11 IST

सरकार येऊन अडीच वर्ष झाली, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे असं अजित पवारांनी सांगितले.

सांगली –  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी बीकेसीतील सभेत भारतीय जनता पार्टीवर हल्लोबल केला. पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही नवाब मलिक, अनिल देशमुखांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसला असता असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला. मात्र आता यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य करत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय. त्यावर काही बोलायचं नाही असं विधान केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, सरकार येऊन अडीच वर्ष झाली, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मी मागेही सांगितले मला ज्यावेळी योग्य वाटेल तेव्हा मी बोलेन. मला आता सांगावं वाटत नाही. अजित पवार तोपर्यंत कधी बोलणार नाही. सरकार आले काम करतंय. सकाळी ८ वाजता शपथविधी झाला. त्याला पहाटे कसं म्हणता येईल. सरकार होऊन अडीच वर्ष झाले. आता काही बोलायचं नाही. योग्य वेळी बोलेन असं त्यांनी म्हटलं.

तसेच मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी मी बोलणार असं सांगितले होते. ते बोलले नसते तर मुख्यमंत्री का बोलत नाही असा अर्थ काढला असता. ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी काय भूमिका मांडायची त्यांचे मत आहे. मला ते काही बोलले त्यावर प्रतिक्रिया देण्यात रस नाही. दुर्दैवाने विकासाच्या कामाबद्दल बोलण्याऐवजी हेडिंगसाठी बातम्या दिल्या जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असंही अजित पवार म्हणाले.

शरद पवारांवरील विधान योग्य नाही – अजित पवार

प्रत्येक व्यक्ती कुणाला आदर्श ठेवून काम करते. शरद पवारांची ६० वर्षाच्या कारकिर्दीत सातत्याने महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगला विचार पुढे घेऊन आले आहेत. कमरेखालचे वार ते कधीच करत नाही. यशवंतराव चव्हाणांच्या पथडीत ते तयार झाल्याने कधी त्यांचा तोल ढासळला नाही. अशा व्यक्तीविरोधात कुणी घाणेरडे वक्तव्य करते हे योग्य नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की...

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानं त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे. यावर देखील उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. हो, आम्ही काँग्रेससोबत गेलो, मात्र ते उघड गेलो. आम्ही केलं ते उघड केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर पाप आणि तुमची पहाटेची शपथ काय होती? जर ती यशस्वी झाली असती तर आज नवाब मलिकांसोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे