शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

"कार्यकर्ते बोलायला लागले तर..."; सुरेश धसांच्या 'त्या' विधानावर अजित पवारांनी फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 18:27 IST

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांनी का निर्णय घ्यावा असं सुरेश धस यांनी म्हटल्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिला.

Beed Sarpanch Murder Case: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातल्या राजकारण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले असून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करत आहेत. मात्र पक्षातील वरिष्ठांकडून धनंजय मुंडे यांच्यावर विनाकारण आरोप करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं असून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाही तर अजित पवारांनी निर्णय घ्यावा असं म्हटलं. यावर आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सोमवारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नसून अजित पवारच निर्णय घेतील असं म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांनी हे विधान केले. यानंतर माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरेश धस यांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारला. त्यावर बोलताना सुरेश धस यांना काय वाटतं त्याच्याशी माझं काही घेणं देणं नसल्याचे अजित पवार म्हणाले.

"सुरेश धस यांना काय वाटतं त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मी चर्चा करत असतो. त्यांच्याशी चर्चा करुन महायुतीचे सरकार व्यवस्थित पुढे काम करावं. यामध्ये एकनाथ शिंदे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो. वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काय अंतच राहणार नाही. त्यासंदर्भात जी काही भूमिका असेल ती अमित शाह, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे सांगतील. हे बरोबर आहे ना," असं अजित पवार म्हणाले. 

आरोप झाल्यानंतर तुम्ही पण ७२ दिवस मंत्रीमंडळातून बाहेर होता असं पत्रकारांनी म्हणतात माझी गोष्ट वेगळी आहे असं म्हटलं. "माझ्या वेळेस जी काही घटना घडली त्यावेळे मला असह्य झालं म्हणून मी राजीनामा दिला. आता चौकशा सुरु आहेत. दोषी कुणीही असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. त्यावर कारवाई केली जाईल," असं अजित पवार म्हणाले.

आम्ही भाजपचे आहोत - सुरेश धस

"अजित पवार निर्णय घेतील आणि त्यांनीच निर्णय घ्यावा. या प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? आमच्या पक्षाचे ते नाही आहेत. त्यांचा राजीनामा आम्ही घेऊ शकत नाही. त्यांच्या पक्षाचेच आमदार राजीनामा घेतला जावा म्हणत आहेत. पण अजित पवार घेत नाहीत. अजित पवारांनी घ्यायचं की नाही ठरवायचं आहे. आमचं जरा लांबचं नात आहे. आम्ही भाजपाचे आहोत," असं सुरेश धस म्हणाले.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणAjit Pawarअजित पवारSuresh Dhasसुरेश धसDhananjay Mundeधनंजय मुंडे