शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अजित पवार खुश नाहीत, कदाचित..; शरद पवार-अजितदादा भेटीवर संजय राऊतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 12:58 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही गुप्त राहत नाही. राजकारणात काहीही घडू शकते असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पुण्यातील एका उद्योगपतीच्या घरी ही बैठक झाली. या भेटीबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली.परंतु माध्यमांना याची कुणकुण लागताच सर्व कॅमेरे उद्योगपतीच्या घराबाहेर लागले. तितक्यात शरद पवारांची कार बंगल्याबाहेर पडली. त्यानंतर अर्धा तासाने अजितदादाने माध्यमांना चकवा देत बाहेर पडले. यावर संजय राऊतांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, शरद पवार-अजित पवारांच्या भेटीचं माध्यमांमधून ऐकलं. अद्याप दोन्ही नेत्यांनी यावर भाष्य केले नाही. नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी भेटू शकतात. मग अजित पवार-शरद पवार का भेटू शकत नाहीत? शरद पवार यावर दोन दिवसांत बोलतील कळाले आहे. कदाचित इंडियाच्या बैठकीला सामील होण्यासाठी शरद पवारांनी अजित पवारांना निमंत्रण दिले असेल. बाकी काय असणार आहे? असा टोला लगावला.

त्याचसोबत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही गुप्त राहत नाही. राजकारणात काहीही घडू शकते. पहाटेच्या शपथविधीप्रमाणे परत फिरा आणि ३१ ऑगस्टच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी व्हावे. सध्याच्या महाराष्ट्र सरकारमध्ये कुणीही खुश नाही. या सरकारची अत्यंत अवस्था बिकट आहे. अजित पवारांपासून देवेंद्र फडणवीसापर्यंत कुणीही सरकारच्या कारभारावर खुश नाही. जनता तर अजिबात खुश नाही. राजकारणातील उलथापालथ होईल असं बोलले जाते. त्याची दुसरी बाजूसुद्धा आहे. ती तुम्हाला लवकरच कळेल असं विधानही खासदार संजय राऊतांनी केले आहे.

वाराणसी जिंकणं मोदींना कठीण जाईल

आम्ही दिल्लीत आहोत. राष्ट्रीय राजकारण पाहत असतो. वाराणसीतून प्रियंका गांधी उभ्या राहिल्या तर मोदींना वाराणसी जिंकणे कठीण जाईल. प्रियंका गांधी जिंकतील अशी मला खात्री आहे. यावेळी अमेठी, रायबरेली, वाराणसी याचे वेगळे निकाल लागतील. देशाचे राजकारण पूर्णपणे बदलेल. राहुल गांधींच्या मागे देश उभा राहिले असे चित्र आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांमध्ये जी चिडचिड आहे ती राहुल गांधींना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आहे असा चिमटा खासदार संजय राऊतांनी भाजपाला काढला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत