शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच घेतला होता राजीनाम्याचा निर्णय?, कारण विचारताच म्हणाले होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 19:16 IST

अजित पवार यांनी आज तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्यानं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंपच झाला आहे.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्यानं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंपच झाला आहे. परंतु, आमदारकी सोडण्याचा निर्णय अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच घेतला होता, अशी माहिती आता समोर आली आहे. 

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, अजित पवार यांच्या राजीनाम्याबद्दल काही महत्त्वपूर्ण खुलासा केला. 'दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आपल्याला फोन केला होता. तुम्ही कुठे आहात एवढंच त्यांनी विचारलं होतं. मी त्यावेळी औरंगाबादला होतो. त्यानंतर, आज संध्याकाळी ५.४० वाजता त्यांनी विधानभवनातील माझ्या दालनात सागर नावाच्या 'पीएस'कडे स्वतःच्या हस्ताक्षरातील राजीनामा सोपवला. मी फोनवर त्यांना कारण विचारलं असता, आत्ता काही सांगत नाही, फक्त राजीनामा मंजूर करा, एवढंच ते म्हणाले' असं हरिभाऊ बागडे यांनी नमूद केलं. त्यांनी दिलेल्या या माहितीमुळे अनेक नवे प्रश्न, शंका निर्माण झाल्या आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अजित पवार यांचे काका शरद पवार आज दुपारी ईडी कार्यालयात जाणार होते. त्यामुळे सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांची रीघ सिल्वर ओक बंगल्यावर लागली होती. त्यात अजित पवार कुठेच नव्हते. हा प्रश्न माध्यमांनी नेतेमंडळींना विचारला. त्यावर, अजितदादा त्यांच्या मतदारसंघात पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सहभागी झाल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. स्वतः शरद पवार यांनी आपल्यासमोरच त्यांना तसा सल्ला दिल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं. परंतु, हे दावे कितपत खरे होते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण, आज सकाळपासून अजित पवार मुंबईतच होते आणि संध्याकाळी त्यांनी राजीनामा दिल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.

लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यावरून पवार कुटुंबात अंतर्गत कलह उद्भवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर, पार्थ पवार यांचा पराभव होणं आणि रोहित पवार प्रकाशझोतात येणं, हे लक्षवेधी ठरलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस