शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'घड्याळ तेच, वेळ नवी, अजित पवारांच्या पर्वाची सुरूवात'; आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 18:36 IST

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यापैकी जवळपास २२०७ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहे. यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. तर काँग्रेससोबतच शरद पवार गट आणि ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाल्याची पाहायला मिळत आहे. 

महायुतीने १३३५ ठिकाणी बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीला ५२६ जागांवर समाधान मानवे लागले आहे. तर इतर ३४६ जागांवर विजयी झाले आहे. यामध्ये भाजपा ६५४, अजित पवार गट ३९२, शिंदे गट २८९, काँग्रेस २७१, शरद पवार गट १४५, ठाकरे गट ११० जागांवर विजयी झाले आहेत. भाजपानंतर अजित पवार गटाला सर्वाधिक यश मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजित पवार गटाने ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. 

महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत जे राष्ट्रवादीला यश लाभले, त्याबद्दल ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळाल आहे. घड्याळ तेच, वेळ नवी अजित पवारांच्या पर्वाची सुरूवात झाली आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत अजित पवारांना असचं यश मिळेल, असा अजित पवार गटातील नेते आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, महायुतीच्या या विजयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला आहे. हे महायुतीवरील मतदारांचं प्रेम आहे, मतदारांचा विश्वास आहे. मी जनतेला धन्यवाद देतो, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत, तसेच महिलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. शासन सर्वांच्या दारी पोहोचलं आहे. आणखी जोमाने आम्ही काम करु, असं एनकाथ शिंदे म्हणाले. सर्व समाजाने आम्हाला पाठबळ दिलं, आशिर्वाद दिला. घरी बसून राज्य चालवता येत नाही, हे लोकांनी दाखवून दिलं, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस