शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

Aurangabad Violence: पोलिसांच्या खांद्यावर बंदुक ठेवून अजित पवारांचा CM वर नेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 13:47 IST

अजित पवार यांनी औरंगाबाद दंगलीवर सरकावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.

मुंबई- औरंगाबादमध्ये दोन गटात झालेल्या वादावादीनंतर उसळलेल्या दंगलीवरून सरकारवर सर्वस्तरातून टीका केली जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही औरंगाबाद दंगलीवर सरकावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. तसंच पोलीस प्रशासनालाही यासाठी तितकंच जबाबदार धरलं आहे. औरंगाबादमधील हिंसा हे सरकारचं पूर्ण अपयश असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.हिंसेच्या वेळी पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांनी सतर्क राहायला हवं होतं, असं अजित पवार म्हणाले. तसंत औरंगाबादमधील प्रकारासाठी अजित पवार यांनी गृहखातं सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. कडक कारवाई करण्यात मुख्यमंत्री कमी पडत आहेत. दोषींना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जावी,अशी खरमरीत टीका अजित पवार यांनी केली आहे. 

दरम्यान, औरंगाबादमधील हिंसाचारावरून सामना संपादकीयमधूनही सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. औरंगाबादमधील हिंसाचार म्हणजे राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा पुरावा असल्याची टीका सामनातून करण्यात आली. किरकोळ कारणावरून दंगल भडकते व त्यातून कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. ही कारणं पुचाट आहेत व दंगली निदान अशा कारणांमुळे तरी भडकू नयेत. राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा हा पुरावा आहे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून टीका केली. शहराला गेल्या कित्येक महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाहीत. इतक्या मोठ्या  संवेदनशील शहरास आयुक्त मिळू नये हेच मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्याचे अपयश आहे. ‘भाजप’धार्जिणा अधिकारी गळास लागत नाही तोपर्यंत पोलीस आयुक्त नेमायचा नाहीअसा पण मुख्यमंत्र्यांनी केला आहे काय?'', असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस