शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Aurangabad Violence: पोलिसांच्या खांद्यावर बंदुक ठेवून अजित पवारांचा CM वर नेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 13:47 IST

अजित पवार यांनी औरंगाबाद दंगलीवर सरकावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.

मुंबई- औरंगाबादमध्ये दोन गटात झालेल्या वादावादीनंतर उसळलेल्या दंगलीवरून सरकारवर सर्वस्तरातून टीका केली जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही औरंगाबाद दंगलीवर सरकावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. तसंच पोलीस प्रशासनालाही यासाठी तितकंच जबाबदार धरलं आहे. औरंगाबादमधील हिंसा हे सरकारचं पूर्ण अपयश असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.हिंसेच्या वेळी पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांनी सतर्क राहायला हवं होतं, असं अजित पवार म्हणाले. तसंत औरंगाबादमधील प्रकारासाठी अजित पवार यांनी गृहखातं सांभाळत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. कडक कारवाई करण्यात मुख्यमंत्री कमी पडत आहेत. दोषींना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जावी,अशी खरमरीत टीका अजित पवार यांनी केली आहे. 

दरम्यान, औरंगाबादमधील हिंसाचारावरून सामना संपादकीयमधूनही सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. औरंगाबादमधील हिंसाचार म्हणजे राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा पुरावा असल्याची टीका सामनातून करण्यात आली. किरकोळ कारणावरून दंगल भडकते व त्यातून कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. ही कारणं पुचाट आहेत व दंगली निदान अशा कारणांमुळे तरी भडकू नयेत. राज्याची कायदा-सुव्यवस्था कोसळून पडल्याचा हा पुरावा आहे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून टीका केली. शहराला गेल्या कित्येक महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाहीत. इतक्या मोठ्या  संवेदनशील शहरास आयुक्त मिळू नये हेच मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्याचे अपयश आहे. ‘भाजप’धार्जिणा अधिकारी गळास लागत नाही तोपर्यंत पोलीस आयुक्त नेमायचा नाहीअसा पण मुख्यमंत्र्यांनी केला आहे काय?'', असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस