शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

अजित पवारांनी वेळीच असंगाशी संगत केली आणि आम्हाला धोका दिला; रावसाहेब दानवेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 17:47 IST

अजित पवार तुमच्यासोबत आल्याने तुमचे नुकसान झाले का, असा प्रश्न रावसाहेब दानवेंना विचारण्यात आला होता.

लोकसभेला अजित पवार गटामुळे महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेला नुकसान झाल्याची टीका केली जात आहे. यामुळे महायुतीत लोकसभेचा निकाल लागल्यापासूनच फटाके फुटू लागले आहेत. अनेकदा भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अजित पवार सोबत नको अशी उघड भूमिका घेतलेली आहे. असे असताना अजित पवार सोबत आल्याने नुकसान झाले का या प्रश्नावर माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवार तुमच्यासोबत आल्याने तुमचे नुकसान झाले का, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. यावर मी त्यांना उत्तर दिले की, अजित पवार आमच्यासोबत आल्याने आमचे नुकसान झालेले नाही. पण 2019 ला विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी अजित पवार विरोधकांसोबत गेल्याने आमचे नुकसान झाल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. 

२०१९ मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढली. लोक आम्हाला बोलले की, तुम्ही पुन्हा एकदा सरकार बनवा. बाळासाहोब ठाकरेंनी कधीही काँग्रेसशी युती केली नाही. सत्तेच्या लालचेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. त्यामुळे आमचे सरकार बनू शकले नाही आणि आमचे नुकसान झाले असे दानवे म्हणाले.

याचबरोबर यावेळी अजित पवारांनी वेळीच असंगाशी संगत केली आणि आम्हाला धोका दिला, त्यामुळे आमचे नुकसान झाल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही दानवेंनी अजित पवारांवर टीका केलेली आहे. पहाटेची शपथ घेऊन अजित पवार यांनीच स्वार्थीपणा केला. आमच्यासोबत गणिते जुळली नाहीत म्हणून पुन्हा त्यांनी काँग्रेस आणि शिवसनेसोबत हातमिळवणी केली, अशी टीका २०२३ मध्ये दानवेंनी केली होती.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा