Imtiaz Jaleel News: पावसाची वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांत पाऊस सरासरीपेक्षा ६० टक्के जास्त झाल्याने पूरस्थिती ओढावली. त्यात भर म्हणजे मध्य महाराष्ट्रातही पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे मराठावाडा जलमय झाला असून, दोन आठवड्यांत मराठवड्याचे चित्रच बदलले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे. मराठवाडा, सोलापूरसह अनेक ठिकाणी पाऊस आणि पूरस्थिती कायम आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांना होणारा त्रास एका मिनिटात संपेल, असा खोचक टोला शिवसेना शिंदे गटाला लगावण्यात आला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुराची परिस्थिती आहे. सोलापुरातील पूरग्रस्त तिऱ्हे गावाला भेट दिली. एमआयएम पक्षाकडून पूरग्रस्त भागांना मदत केली जात आहे. सरकारकडून पूरग्रस्त लोकांची जी अपेक्षा आहे, ती पूर्ण झाली नाही. राज्यात पूरग्रस्त भागात मंत्र्यांचे दौरे आणि फोटोसेशन आहे ते बंद करावेत, अशी टीका एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी केली.
गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल
सध्याच्या घडीला मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात गुगल मॅपच्या माध्यमातून पूरस्थितीची पाहणी करावी, आणि गुगल मीटिंगमध्ये निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना मदत करता येईल ते बघावे. पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत, सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होतात. ही सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, या शब्दांत निशाणा साधताना, गुवाहाटी येथून आणलेले पैसे जर दिले, तर महाराष्ट्रातील लोकांना होणारा त्रास एका मिनिटात संपवू शकता, असा खोचक टोला इम्तियाज जलील यांनी लगावला.
दरम्यान, रविवारीही मराठवाड्यासह, नाशिक, जळगाव, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर जिल्ह्यांना पावसाने झोडपले. सोलापुरात सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नाशिकमध्ये गोदावरीचा पूर कायम आहे.
Web Summary : Imtiaz Jaleel criticized the Shinde group, suggesting funds from Guwahati could alleviate flood-related suffering in Maharashtra. He urged ministers to stop photo ops and provide real assistance to flood-affected farmers, proposing Google Maps monitoring and meetings for effective aid delivery.
Web Summary : इम्तियाज जलील ने शिंदे गुट की आलोचना करते हुए कहा कि गुवाहाटी से आए फंड से महाराष्ट्र में बाढ़ पीड़ितों का दुख दूर हो सकता है। उन्होंने मंत्रियों से फोटो सेशन बंद करने और बाढ़ प्रभावित किसानों को वास्तविक सहायता प्रदान करने का आग्रह किया, साथ ही प्रभावी सहायता वितरण के लिए गूगल मैप्स की निगरानी और बैठकों का प्रस्ताव रखा।