शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

Imtiaz Jaleel: “कुणाच्या आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर नाही, माझ्या ‘डेथ सर्टिफीकेट’वरही औरंगाबादच नाव हवं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 15:43 IST

Imtiaz Jaleel: केवळ हिंदुत्व दाखवण्यासाठी व बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद नामांतराचा निर्णय घेतला, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.

औरंगाबाद: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले होते. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आता एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी याविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा देत, कुणाच्या आजोबांच्या इच्छेसाठी नामांतर नाही, माझ्या ‘डेथ सर्टिफीकेट’वरही औरंगाबादचेच नाव हवे, असे ठणकावून सांगितले आहे. 

इम्तियाज जलील यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, यावेळी काही महत्वाचे ठराव घेण्यात आले. या बैठकीत एमआयएम, राष्ट्रवादी, काँग्रेससह अनेक संघटनेच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. जगभरात औरंगाबाद शहराची ऐतिहासिक ओळख आहे. परंतु केवळ हिंदुत्व हा मुद्दा दाखवण्यासाठी व बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचे नामांतर होऊ देणार नाही. यासाठी कायदेशीर लढाई उभारली जाईल, तसेच गरज पडल्यास रस्त्यावर सुद्धा उतरू असा इशारा जलील यांनी दिला आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला आमचा विरोध नाही

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला आमचा विरोध नाही, आम्ही त्यांचा आदर करतो, संभाजी महाराजांचे नाव द्यायचे असेल तर ते पुणे शहराला देऊन दाखवा, असे आव्हान जलील यांनी यावेळी बोलताना दिले. औरंगाबादच्या नामांतरावेळी आपण शांत राहिलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला नक्कीच विचारतील की, जेव्हा या शहराचे नामांतर होत होते, तेव्हा तुम्ही काय करत होता. त्यामुळे नामांतराला विरोध व्हायलाच हवा. माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला असून, मला मृत्यूही औरंगाबादमध्येच यायला हवा. माझ्या बर्थ सर्टिफीकेटवर औरंगाबाद आहे. तर डेथ सर्टिफीकेटवरही औरंगाबादच असायला हवे, असेही जलील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, जाता जात यांनी खालच्या दर्जाचे राजकारण केले आहे. त्यांना बहूमत चाचणी सिद्ध करायची होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव त्यांना दिसत असल्याने त्यांनी जाता जाता हे वाईट राजकारण खेळले आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सांगू इच्छितो नावे बदलली तरी इतिहास कुणी बदलू शकत नाही. तुम्ही राजकारणाच्या खालच्या पातळीचे उदाहरण दिले आहे. फक्त नागरिकच ठरवू शकतात की औरंगाबाद शहराचे नाव हे काय असायला हवे. या विरोधात आम्ही आंदोलने करु, असा इशाराही जलील यांनी यावेळी दिला.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळImtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे