शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महायुतीत बेबनाव? भाजपाच्या मित्रपक्षानेच जाळला राज्य सरकारमधील मंत्र्यांचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 14:12 IST

Maharashtra Politics: नेमके प्रकरण काय?

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. यानंतर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे महायुतीचे सरकार कारभार पाहू लागले. आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राज्यात आंदोलने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणावरून समाज आक्रमक झाल्याचे दिसत असून, दुसरीकडे विविध मुद्द्यांवरून शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

यातच महायुतीत बेबनाव आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण भाजपच्या एका मित्रपक्षाने राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा पुतळा जाळल्याची घटना घडली आहे. सरकोली ता. पंढरपूर जि. सोलापूर येथे रयत क्रांती संघंटनेच्या व ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. ऊस बंदीच्या निर्णयाविरोधात रयत क्रांती संघटनेने राज्यभर सहकार मंत्र्यांचा पुतळा जाळो आंदोलन केले. रयत क्रांती संघटनेने केले सहकार मंत्र्यांचा पुतळा जाळो आंदोलन

राज्य सरकारने या वर्षीच्या हंगामात ऊसावर झोनबंदी लावली आहे. १९९६ साली राज्य सरकारने झोनबंदी लावली होती. स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली आणि त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी झोनबंदी उठवून ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पायातील बेड्या काढल्या. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या  नेतृत्वाखालील राजकारण करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी झोनबंदी लावून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

दरम्यान, एका बाजूला ऊसाचे उत्पादन घटले आहे. ऊत्पादन खर्च वाढला असताना ऊसाची कांडी ही सोन्याची कांडी आहे  ,मजुरी वाढली, खताच्या किमती चौपट झाल्या आहेत. नागंरटीचा खर्च वाढला आहे त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघत नाही. आता सरकारने ऊसाचा FRP प्रती टन पाच हजार भाव जाहीर करावा. नाहीतर झोनबंदी उठवावी जर झोनबंदी नाही उठवली तर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील वाजत गाजत बाहेरच्या राज्यात ऊस घेऊन जावू, असे सांगत रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सरकारला आवाहन केले आहे.

 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारFarmerशेतकरीDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील