शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ५० नेते फुटीच्या उंबरठ्यावर; भाजपची वाटचाल 'राष्ट्रवादी जनता पार्टी'कडे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 17:55 IST

२०१९ विधानसभेसाठी भाजपने राष्ट्रवादी पक्षच रिकामा करण्याचा धडाका सुरू केला. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप केले, त्यांनाही पक्षात घेण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे.

मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे भरमसाठ आरोप करून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची चांगलीच तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळावलेल्या विजयानंतर सर्वात मजबूत ठरलेल्या भाजपला पुन्हा सत्ता मिळविण्याचा विश्वास आहे. परंतु, सध्या भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना देण्यात येत असलेला प्रवेश पाहून भाजपच स्वरुप राष्ट्रवादी जनता पार्टी असं होतय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. विविध घोटाळ्यांच्या आरोपांनी २०१४ ची निवडणूक गाजली होती. सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना तुरुंगात जाव लागणार असा इशारा, त्यावेळी भाजपकडून देण्यात आला. मात्र तस काहीही झालं नाही. याउलट २०१९ विधानसभेसाठी भाजपने राष्ट्रवादी पक्षच रिकामा करण्याचा धडाका सुरू केला. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप केले, त्यांनाही पक्षात घेण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे.

आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ३० नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यामध्ये महिला नेत्यांचा देखील समावेश आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात आणखी ५० आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांचा समावेश असल्याचे समजते. भाजपमध्ये ही इनकमिंग अशीच सुरू राहिल्यास, येणाऱ्या काळात भाजप नेतृत्वाला देखील पक्षांतर करून आलेले आणि पक्षातील नेते यांचा हिशोब ठेवण्यासाठी खास माणसं नियुक्त करावी लागतील.

स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी

भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्याची कारण आता स्पष्ट होत आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून भाजप निवडणुकीला सामोरे गेले. त्याचवेळी विधानसभेला देखील युती राहणार हे निश्चित करण्यात आले होते. परंतु, राज्यात वाढलेली ताकत पाहता भाजपचा इरादा स्वबळावर लढण्याचा दिसून येतो. अशा स्थितीत स्वबळावर लढायचे म्हटल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेणे फायदेशीरच ठरणार आहे. त्यामुळे भाजपची ही स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी असण्याची दाट शक्यता आहे.