शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
5
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
6
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
7
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
8
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
9
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
10
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
11
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
12
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
13
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
14
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
15
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
16
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
17
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
18
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
19
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
20
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा ५० नेते फुटीच्या उंबरठ्यावर; भाजपची वाटचाल 'राष्ट्रवादी जनता पार्टी'कडे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 17:55 IST

२०१९ विधानसभेसाठी भाजपने राष्ट्रवादी पक्षच रिकामा करण्याचा धडाका सुरू केला. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप केले, त्यांनाही पक्षात घेण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे.

मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे भरमसाठ आरोप करून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची चांगलीच तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळावलेल्या विजयानंतर सर्वात मजबूत ठरलेल्या भाजपला पुन्हा सत्ता मिळविण्याचा विश्वास आहे. परंतु, सध्या भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना देण्यात येत असलेला प्रवेश पाहून भाजपच स्वरुप राष्ट्रवादी जनता पार्टी असं होतय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. विविध घोटाळ्यांच्या आरोपांनी २०१४ ची निवडणूक गाजली होती. सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना तुरुंगात जाव लागणार असा इशारा, त्यावेळी भाजपकडून देण्यात आला. मात्र तस काहीही झालं नाही. याउलट २०१९ विधानसभेसाठी भाजपने राष्ट्रवादी पक्षच रिकामा करण्याचा धडाका सुरू केला. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप केले, त्यांनाही पक्षात घेण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे.

आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ३० नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून यामध्ये महिला नेत्यांचा देखील समावेश आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात आणखी ५० आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांचा समावेश असल्याचे समजते. भाजपमध्ये ही इनकमिंग अशीच सुरू राहिल्यास, येणाऱ्या काळात भाजप नेतृत्वाला देखील पक्षांतर करून आलेले आणि पक्षातील नेते यांचा हिशोब ठेवण्यासाठी खास माणसं नियुक्त करावी लागतील.

स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी

भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्याची कारण आता स्पष्ट होत आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून भाजप निवडणुकीला सामोरे गेले. त्याचवेळी विधानसभेला देखील युती राहणार हे निश्चित करण्यात आले होते. परंतु, राज्यात वाढलेली ताकत पाहता भाजपचा इरादा स्वबळावर लढण्याचा दिसून येतो. अशा स्थितीत स्वबळावर लढायचे म्हटल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात घेणे फायदेशीरच ठरणार आहे. त्यामुळे भाजपची ही स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी असण्याची दाट शक्यता आहे.