शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"मी महाराष्ट्राची माफी मागतो"; छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर अजित पवारांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 16:22 IST

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली आहे.

Ajit Pawar on Rajokt Fort :सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. नौदल दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र सोमवारी दुपारच्या सुमारास हा पुतळा अचानक कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. विरोधकांनीही महायुती सरकारला धारेवर धरलं. दुसरीकडे  वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन करण्याचे ठरवलं आहे. मात्र या सगळ्या प्रकाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे.

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. नट बोल्ट गंजल्याने हा पुतळा कोसळला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. तर वाऱ्याचा वेग ४५ किमी प्रतितास होता. त्यामुळे पुतळा कोसळला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. महाविकास आघाडीने आता या प्रकरणावरुन सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाराचार झाल्याचा आरोप मविआने केला आहे. तर पुतळा कोसळ्याच्या घटनेप्रकरणी अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. मी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची माफी मागतो, असं अजित पवार यांनी जाहीर सभेत म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रा अहमदपूर येथे आली असताना त्यांनी माफी मागितली. 

"दोन दिवसांपूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा वाऱ्यामुळे कोसळला. त्यासंदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी केली जाणार आहे. ते कुणी केलं त्याचा तपास लागला पाहिजे. त्यासंदर्भात राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी याबद्दल महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत. त्या दैवताचा पुतळा वर्षाच्या आत कोसळणे हे सगळ्यांना धक्का देणारे आहे. काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकलं पाहिजे. आपल्या इथे कायदे नरम आहेत," असं अजित पवार म्हणाले.

राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राजकोट किल्ल्यावर जोरदार राडा

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मविआ नेत्यांमध्ये आणि खासदार नारायण राणे यांच्यात जोरदार वाद झाला. दोन्ही गटाचे नेते एकाच वेळी तिथे पोहोचल्यानंतर ठाकरे-राणे समर्थक भिडले. त्यानंतर राजकोट किल्ल्यावर जोरदार राजकीय राडा पाहायला मिळाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले होते. किल्ल्याच्या प्रेवशद्वारावर राणेंनी ठिय्या मांडला होता. त्यानंतर दोन तासांनी मविआचे नेते किल्ल्याच्या बाहेर पडले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारsindhudurgसिंधुदुर्गEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस